Tuesday, August 25, 2015

गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवराय - आक्षेप नि खंडण




तुका म्हणे भय न धरी माणसी ! ऐसीयाचे विषी करिता दंड !
तुका म्हणे सत्य सांगे ! येवोत रागे येतील ते !
गुण अवगुण निवाडा ! म्हैस म्हैस रेडा रेडा !
हा तो निवाड्याचा ठाव ! खर्या खोट्या निवडी भाव ! अंगे उणे त्याचे बसे टाळक्यात ! तुका म्हणे आम्ही काय करणे त्यासी ! धक्का खवंदासी लागतसे !
टाका तार्किकाचा संग ! पांडुरंग नित्य स्मरा हो !
भूंकती ते द्यावी भूंको ! आपण ते शिको नयें !
जगद्गुरु तुकोबाराय

सर्वप्रथमच आम्ही स्पष्ट करु इच्छितो की ह्या लेखाचा उद्देश्य ब्राह्मणांना श्रेष्ठ ठरविण्याचा अजिबात नाही. केवळ इतिहास वस्तुनिष्ठपद्धतीने मांडण्याचा आहे.

चरितम् शिवराजस्य भरतस्यैव भारतम् !

शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे, आमची अस्मिता आहे, आमचा स्वाभिमान आहे, आमचा मंत्र आहे. ह्या नावाखाली अख्खा महाराष्ट्र एक होतो. तो होउ नये म्हणून त्यांच्या नावावर जातीपातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न गेली कित्येक वर्षे सुरु आहे. शिवाजी महाराज हे गोब्राह्मण प्रतिपालक होते किॅवा नाही हा वाद मुद्दाम पुन्हा पुन्हा उकरून काढण्यात येतो नि जातीपातीचं राजकारण केलं जातं.शिवाजी महाराज खरंच गोब्राह्नणप्रतिपालक होते का?? की ही ब्राह्मणांनी स्वत:साठी केलेली खेळी आहे ??? नक्की गौडबंगाल काय आहे हे??? हे शोधण्यासाठीच केलेला हा अट्टाहास !

गोब्राह्मण प्रतिपालक म्हणजे नक्की काय???

महाराज गोब्राह्मणप्रतिपालक होते किॅवा नाही हे पहायच्या आधी गोब्राह्मणप्रतिपालक म्हणजे नक्की काय हे समजुन घेऊ. गो म्हणजे गाय ही हिॅदुधर्मात पवित्र नि पुज्य नि अवध्य मानली गेली आहे. वेदांमध्ये १३९ वेळा गाईसाठी "अघ्न्य" म्हणजे अवध्य असा शब्द आला आहे. म्हणजेच वेदांत गोहत्या कुठेच नाही तरीही काही दीडशहाणे वेदांतल्या काही श्लोकांचा चुकीचा अर्थ काढून वेदांत गोहत्या आहे असं प्रतिपादन करतात. त्यांचा शंकांचं निरसन करण्याचा प्रस्तुत लेखाचा विषय नि उद्देश्यही नाही. त्यामुळे शिवाजीमहाराजांनी गाईंचे संरक्षण नि प्रतिपालक स्वत:ला म्हटलं तर त्यात पाप ते काय??? पोटात गोळा यायचं कारण काय??? डाॅ आंबेडकरांसारखा नास्तिक नि हिॅदु धर्मावर टीका करणारा मनुष्य देखील देखील गोहत्या करु नका असं त्यांच्या Untouchables - who were they ह्या ग्रंथात सांगतात. आंबेडकर म्हणतात
"जर आपण गायींची हत्या केली तर आपण आपल्या कृषीविकासाशी तडजोड केल्यासारे होईल. म्हणूनच की काय आपल्या पूर्वजांनी हेतु:पुरस्सर गोहत्येवर बंदी घातली होती"

आता ब्राह्मणांविषयी !

ब्राह्मण कुणाला म्हणाव ह्याचे शास्त्रात जे संदर्भ दिले आहेत ते खालीलप्रमाणे !

यो ब्रह्म जानाति स ब्राह्मण: !
जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण। !

म्हणजो जो प्रत्यक्ष ईश्वराला जाणतो, त्याचा अनुभव घेतो, त्याचा साक्षात्कार अनुभवतो, किंवा तो जाणण्यासाठी काटेकोर नियमांचं पालन करतो तो ब्राह्मण ! ब्रह्म जाणण्यासाठीच्या आतारसंहितेचे जो काटेकोर पालन करतो, तो ब्राह्मण !

समर्थांनी दासबोधात हेच सोप्या पद्धतींत सांगितलं आहे

करिती ब्रह्मनिरुपण ! जाणती ब्रह्म संपूर्ण !
ते चि जाणावे ब्राह्मण ! ब्रह्मविद् !
दशक ६.४.२४

हे ब्रह्मनिरुपण किॅवा ब्रह्म जाणणे म्हणजेच आत्मज्ञान होय. समर्थ म्हणतात

जयांसि झाले आत्मज्ञान ! ते चि थोर महाजन !
वेदशास्त्रे, पुराणे ! साधु-संत बोलिले !
दशक - ६.४.१९

ब्रह्म म्हणजेच ईश्वरास जाणणे म्हणजेच आत्मज्ञान ! ब्रह्म पर्यंत पोहोचून त्याविषयी म्हणजे विश्वामागच्या किॅवा पलीकडील विश्वातीत रुपाची लोककल्याणार्थ उकल करणारे ते ब्राह्नण.

आता ही स्थिती प्राप्त होण्यासाठी काय गुणसंपदा किॅवा आचारसंहिता आवश्यक आहे ती गोतेत भगवंत खालीलप्रमाणे सांगतात

शमो दमस्तप: शौचं क्षान्तिरार्जमेव च !
ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् !

शम, दम् तप, शुचिता, शांती, सरलता, ज्ञान, आत्मज्ञान आणि वेदांच्या प्रमाणत्वावर निष्ठा ही स्वाभाविक ब्रह्मकर्मे किॅवा ब्राह्मणाचे गुणकर्म होय.

आता अशा समाजास मार्गदर्शक असणार्या आचारसंपन्न व्यक्तीचा आदर्श असणे वाईट काय आहे??? अशा व्यक्तींचं संरक्षण करणे हे राजाचे कर्तव्य नव्हे काय??? आजही आपण आपल्या समाजातल्या विविध स्तरांवरच्या लोकोत्तर पुरुषांची काळजी घेतो मग ते वैज्ञानिक असोत किंवा समाजसुधारक असोत किॅवा तत्वज्ञ किॅवा काहीही मार्गदर्शक आहोत. आपण त्यांची सुरक्षा करतोच. त्यांना आजच्या भाषेत Z Plus सुरक्षा देतो मग ते कोणत्याही जातीचे का असेनात. मग शिवछत्रपतींनी त्याकाळी अशा विद्वान नि ज्ञानी नि चारित्र्यसंपन्न अशा काही ब्राह्मणांचं प्रतिपालन केलॅ असेल तर त्यात बिघडलं कुठं???? ह्याचं पाप ते काय??? किॅवा ह्यात जातीवाद तो काय???? ह्यात ब्राह्मणांची दादागिरी आहे काय???

हो महाराज गोब्राह्मणप्रतिपालकच होते ! हे घ्या पुरावे ! ऐतिहासिक साधनांच्या सहाय्याने केलेला हा चिकित्सक प्रयत्न !

सर्वप्रथम आपण समकालीन पुरावे पाहु. ते खालीलप्रमाणे

श्रीशिवराय गोब्राह्मणप्रतिपालक असल्याचा पुरावा 👇

शिवकालीन पत्रसारसंग्रह - शके १५६९ म्हणजे १६४७-४८ -  पत्र क्रमांक २५१९ त्यात उल्लेख आहे की

"महाराज गोब्राह्मणाचे प्रतिपालक आहेती"



श्रीशंभुराजेंनी स्वत: बाकरेशास्त्रींना दिलेल्या त्यांच्या संस्कृत दानपत्रात शिवरायांना "देवद्विजप्रतिपालक" म्हणजे ब्राह्मण प्रतिपालक म्हटलंय !

ब्राह्मण प्रतिपालक असल्याचा पुरावा

नलावडे नावाच्या नाईकवाड्याने प्रभावळी सुभेदाराच्या ब्राह्नण सबनिसाशी भांडण करून त्याच्यावर तरवारेचा हात टाकिला आणि अखेर आपलेच पोटात सुरी मारून घेऊन जीव दिला.
हे समजल्यावर शिवछ्त्रपतींनी ८ सप्टेंबर, १६७१ च्या पत्रात सुभेदार तुको राम ह्याला पत्र लिहिल आहे
"नलावड्याने मराठा होऊन ब्राह्मणावरी तरवार केली याचा नतीजा तोच पावला."
संदर्भ - मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८ क्रमांक २४ चे पत्र

समकालीन नि विश्वसनीय अशा शिवभारतातले पुरावे

शिवछत्रतींच्या इतिहास साधनांत शिवभारत हे समकालीन साधन असल्याने ते प्रमाण मानले जाते. आणि ह्याबाबतीत सर्व इतिहासकारांचे एकमत आहे. हे शिवचरित्र जरी अफझुल्ल्याच्या वधापर्यंत असले तरीही ते शिवछत्रपतींच्या समोरच लिहिले गेले असल्याने अतिशय चिंतनीय आहे. शिवभारतकार कवींद्र परमानंद हे सुरुवातीलाच म्हणतात की आपण हे काव्य शिवाजी महाराजांच्या आज्ञेने लिहीत आहे आणि त्यांची विश्वासार्हता वारंवार प्रत्ययास आल्याने परमानंदांनी ह्या ग्रंथात शिवजन्माची नि अफझुलखान वधाची अशा फक्त दोनच तारखा दिल्या आहेत ज्या इतर साधनांशी ताडून बघता अचुक जुळते ह्यावरूनच ते त्याला कुणीही आक्षेप त्यावेळी तरी कुणी घेतलेला नाही. ह्यावरूनच परमानंदांना शिवचरित्राची जवळून माहिती होती त्यामुळे ते विश्वसनीय खात्रीनेच आहे. अफझुलखान प्रकरणात आणि आग्राच्याही प्रकरणात परमानंद शिवछत्रपतींबरोबर होते ह्याचा पुरावा आहे. आता गोब्राह्नणप्रतिपालकत्वाचे त्यातले पुरावे सविस्तर पाहु.

देवद्विजगवां गोप्का दुर्दान्तयवनान्तक: !
(पहिला अध्याय १५ वा श्लोक)
जो देव, द्विज म्हणजे ब्राह्नण आणि गवां म्हणजे गाईंचे रक्षण करणारा आणि दुर्दम्य यवनांचा काळ किंवा अंत असा

देवानां ब्राह्नणानां च गवां च महिमाधिकम् ! ३९ वा श्लोक)
देव ब्राह्मण आणि गायीचा महिमा याचं वर्णन आहे

त्याकाळच्या स्खितीचं वर्णन करताना परमानंद म्हणतात
न वेदा अप्यधीयन्ते नाभ्यर्च्यन्ते द्विजातय: !
म्लेंच्छधर्मो प्रवर्धन्ते हन्यते धेनवोsपि !
वेदांचे अध्ययन सुटले आहे नि ब्राह्मणांचा सत्कार बंद झाला आहे, म्लेंच्छधर्म वृद्धी पावत आहे आणि गाईंचीही हत्या घडत आहे.
(५ वा अध्याय ४०-४२)

अफझुलखान वधात परमानंद स्वत: शिवछत्रपतींबरोबर होते. त्या संपूर्ण प्रसंगाचं वर्णन करताना शिवछत्रपतींच्या मुखातले उद्गार सांगताना परमानंद म्हणतात

सुराणां भूसुराणांच सुरभीणां च पालनम् !
देवांचे, ब्राह्मणांचे आणि गाईंचे पालन करण्यासाठीच

शिवभारतात आणखी अनेक ठिकाणी शिवरायांना उद्देशून परमानंदांनी गोब्राह्मणप्रतिपालक असा शब्द उच्चारला आहे. तरीदेखील काहीजणांना परमानंदांच्या ब्राह्मण ज्ञातीचा अडसर वाटत असेल तर आपण आणखी काही पुरावे पाहु.

आता प्रत्यक्ष परमप्रतापी छत्रपती श्रीशंभुराजे महाराजांबद्दल काय म्हणतात ते पाहु

ह्या सगळ्यावर संभाजी महाराजांनी जे संस्कृत दानपत्र लिहिलं आहे त्यातील पुरावे !
बाकरेशास्त्रींना दिलेले संस्कृत दानपत्र - २४ आॅगस्ट, १६८०
"सुरुवातीला शंकराला नमस्कार, सद्गुरुला नमस्कार, ब्रह्मा विष्णु महेशांना नमस्कार, गंगा, सरस्वतीला नमस्कार !"
पद्मासनात जो स्थित आहे, कामकलास्तोत्र जो सहा प्रहर रोज पठण करतो तो शंभुराजा असा मी

शिवरायांचे वर्णन करताना ते म्हणतात

शिवराय हे शंकराचे अवतार, वेद,
शास्त्र, स्मृति, आगम, पुराण ह्यांचे जाणकार, जो सदाशिवस्वरुप आहे, देवब्राह्मणप्रतिपालक, सर्व देवालयांचे सरक्षण करण्यासाठी ज्याने आपला जीव खर्च केला, म्लेंछक्षयदीक्षित म्हणजे म्लेंच्छांना धराशायी ज्यांनी केले, ज्याने ताम्र नि तुर्क यांना जर्जर करून सोडले, कल्की अवताराप्रमाणे, हिॅदुधर्माचा जीर्णोध्दार ज्याने केला, अफझुलखानास बिचवा चालवला नि ज्याचे नृंसिहासमान शरीर रक्ताने माखले असा तो माझा पिता !"
आता स्पष्टपणे वर ते शिवरायांना देवब्राह्मणप्रतिपालक म्हणतात. आणखी काय पुरावा हवाय??? तरीदेखील काहीजणांना अजुनही आक्षेप असेल तर ह्या खालील पुरावे पहा.

शंभुराजेकृत बुधभूषणम् आणि ब्राह्मण

पुन्हा एकदा हे सांगणं आवश्यक आहे की ब्राह्मण हा कर्माने नि आचरणाने ब्राह्नण ठरतो. जन्माने नव्हे. म्हणून तर शंभुराजे स्पष्ट पणे बुधभूषणम मध्ये खालीलप्रमाणे सांगतात

अष्टौ पूर्वाणि चिन्हानि नरस्य विनशिष्यत: !
ब्राह्मणान्प्रथमं द्वेष्टि ब्राह्नणश्चैव विरुद्ध्यते !

खालील ८ पूर्वखुणा माणसाचा नाश करतात
१. ब्राह्मणांचा द्वेष करतो,
२. ब्राह्नणांना विरोध करतो किॅवा त्यांच्या कडून अडविला जातो,

ब्राह्मणस्वानि चादत्ते ब्राह्मणांश्च जिघांसति !
रमन्ते निन्दया चैषां प्रशंसां नभिनन्दति !
३. ब्राह्मणांस दास्यवितो, संपत्ती काढून घेतो,
४. हिॅसा करतो,
५. त्यांची निंदा करण्यात रस घेतो,
६. आणि त्यांची प्रशंसा ऐकल्यास आनंदित होत नाही.

नैतान्स्मरन्ति कृत्येषु याचितश्चाभ्यसूयति !
एतान्दोषान्नर: प्राज्ञो वध्ये बुद्ध्वा विवर्जयेत् !
७. त्यांच्या उपकाराचे स्मरण ठेवत नाही
८. याचना करणार्यांचा तो मत्सर करतो.
बुधभूषणम् - ३ अध्याय १२ ते १४ श्लोक

दैवतेषु च यत्नेषु राजसु ब्राह्मणेषु च !
नियन्तव्य: सदा क्रोधो वृद्धबालातुरेषु च !
दैवदेवतांविषयी, राजांविषयी, ब्राह्मणांविषयी, वृद्धांविषयी, लहान मुलांविषयी, आणि दुर्बलांविषयी राग नेहमी प्रयत्नपूर्वक काबुत ठेवाव.

ब्राह्मणेषु क्षमी स्निग्धेष्वजिह्म: क्षोभनोरिषु: !
स्याद्राजा भृत्यवर्गेषु प्रजासु च यथा पिता !
ब्राह्मणाविषयी क्षमाशील असावे, मित्र इत्यादि स्नेह्यांशी सरळ वागावे, शत्रुंविषयी क्रोधाने वागावे.....

शंभुराजे स्वत:बद्दल म्हणतात

धर्मपरंपरेने चालणार्या दाशरथी रामाप्रमाणे जो आहे, शिवयोग्याप्रमाणे ज्याने कपाळावर भस्म लावले आहे, द्विज आणि देवता ह्यांचा आशिर्वाद,
सदाचारी श्रेष्ठ ब्राह्मणाला जो दान धन नि भूमी दान देतो, तो कोटी कल्पांतापर्यंत शिवलोकांत सन्मान पावतो.
ह्या पेणा आणखी काय पुरावा हवाय???

आता काहीजण अजुनही आक्षेप घेतील की शिवरायांनी स्वत:ला गोब्राह्नण प्रतिपालक का म्हटलं नाही???? त्याला आमचं उत्तर

कुणाचं नाव घेऊ नये ह्याची शास्त्रात जी यादी आहे त्यात स्वत:चे व गुरुचं नाव घेऊ नये.
आत्मनाम गुरोर्नाम नामानि कृपणस्यच !
श्रेय:कामानु गृह्णय्यात ज्येष्ठापत्य कलत्रयो: !

मी मी म्हणु नये थोडक्यात स्वत:चं कौतुक करू नये, गुरुचं नाव घेऊ नये, कंजुस माणसाचं नाव घेऊ नये, ज्येष्ट पुत्राचं आणि बायकोचं नावघेऊ नये असं  शास्त्र सांगतं.

शिवाजी महाराजांनी स्वत:ला कधी छत्रपती म्हणून फारसं मिरवलं नाही. त्यामुळे ते छत्रपतीच नव्हचे असं म्हणणं जसं मुर्खपणाचंच ठरेल तद्वतच स्वत:ला गोब्राह्नण प्रतिपालक असं मिरवणंही तितकंच अप्रस्तुत वाटतं. पण तरीही वर उल्लेखिलेल्या नलावडयाचा पत्रातून हे स्पष्ट होतंच आहे.
ह्याच्या उपरही काहीजणांना शंका असेल तर त्यांच्यापुढे आम्हांस हतबलच वाटेल. त्यामुळे इथेच लेखणीला विराम देतो.

प्रौढप्रतापपुरंदर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधीश्वर, गोब्राह्मणप्रतिपालक, हिंदुपदपादशाह, हिंदवी स्वराज्य संस्थापक, हिॅदुकुलभूषण, अखंडलक्ष्मीअलंकृत महाराजाधिराज श्रीमंतश्रीशिवछत्रपती महाराज की जय !!! हिंदुराष्ट्र की जय !!! आर्य सनातन वैदिक हिंदु धर्म की जय !!! जयतु हिंदुराष्ट्रम् !!!

तुकाराम चिंचणीकर

Saturday, August 15, 2015

महायोगी श्रीअरविंदांच्या जयंतीनिमित्त नि स्वातंत्र्यदिनानिमित्त आपणा सर्वांचे हार्दिक अभीष्टचिंतन !!!


महायोगी श्री अरविॅद ! आज जसा हिंदुस्थानचा स्वातंत्र्यदिन तसाच अरविंदांचा जन्मदिवसही ! त्यांची १४३वी जयंती ! मागच्या वर्षी याचदिवशी आदरणीय पंतप्रधानांनी जेंव्हा प्रात:काली स्वातंत्र्यदिनाचा संदेश दिला तेंव्हा श्रीअरविंदांचा उल्लेख केला होता. श्रीअरविंद हे स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील एक महान तत्वज्ञ, महायोगी, कट्टर क्रांतिकारक, वेदांवरचे भाष्यकार, विद्वान, महाकवी, इतिहासकार, भाषाप्रभु, अखंड हिंदुराष्ट्राचे कट्टर समर्थक आणि आणखीही अनेकविध गुणांनी नटलेले एक व्यक्तिमत्व !
काही महिन्यापूर्वी आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी फ्रांसमधल्या दौर्यात अरविंदांच्या पुतळ्यास प्रणाम केला. काय विलक्षण गोष्ट आहे पहा ! मोदी आहेत म्हणून खरंतर हे होतंय ! नाहीतर आपल्या देशात तसेही बरेच जण कोण हे महायोगी अरविंद म्हणून विचारतील आताही नि उद्या भविष्यातही. फ्रांसमध्ये महायोगी अरविंदांचा पुतळा आहे पण आमच्या भारतामध्ये अरविंद माहितीच नाहीत फारसे लोकांना ! किती दुर्दैव म्हणायचं ! ह्याचं उत्तर स्वत: विवेकानंदांनी पण दिलं होतेच म्हणा
" मुलाला शाळेत घातले जाते. तो प्रथम हे शिकतो की आपले वडील हे मुर्ख आहेत, दुसरें म्हणजे आपले आजोबा वेडे आहेत, तिसरे असें की आपले सर्व प्राचीन आचार्य ढोंगी होते, आणि चवथी गोष्ट म्हणजे आपले सर्व धर्मग्रंथ खोटारडे आहेत ! याचा परिणाम असा की पन्नास वर्षाच्या यां शिक्षणांतून, या तींन प्रांतातून मौलिक विचार करणारी एकही व्यक्ती निर्माण होऊं शकली नाही."
ही आहे त्यावेळची परिस्थिती ! आजही काही परिवर्तन झालंय का??? नाहीच नाही ! शालेय अभ्यासक्रमातून श्रीशिवछत्रपती, श्रीअरविंद, श्रीविवेकानंद, रामायण-महाभारत शिकवलं जातं का?? नाहीच नाही ! उलट ते सगळं खोटं कसं आहे हेच ठरविण्याचे प्रयत्न चालतात. आता आपण श्रीअरविंदांच्या चरित्राकडे वळु.
महायोगी श्रीअरविंद चरित्रचिंतन
एतद्देशप्रसुतस्य सकाशादग्रजन्मन: !
स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्यां सर्व मानवा: !
मनुस्मृती
ज्यांच्या जिव्हाग्रांवर प्रत्यक्ष सरस्वतीच नांदत होती असे महापुरुषांच्या जीवनावरचे भाष्यकार एक प्रबोधनकार असे सरस्वतीपुत्र प्राचार्य शिवाजीराव भोसले ह्यांनी अरविंदांवर लिहिलेल्या चरित्रात्मक ग्रंथामुळे नि व्याख्यानांमुळे खरंतर महाराष्ट्राला अरविंदांचं चरित्र माहिती झालं. अरविंदांचं व्यक्तिमत्व, चरित्र, साहित्य नि एकंदरीतच सर्व काही इतकं विलक्षण आहे की ते एका लेखात सांगणं अशक्य आहे, केवळ अशक्य ! तरीही एक लहानसा लेखनप्रपंच !

बंगालमधल्या कलकत्ता भागातल्या एम.डीची परीक्षा उत्तीर्ण असलेल्या डाॅ. कृष्णधन घोष ह्या वैद्यकीय अधिकार्याच्या पोटी १५ आॅगस्ट, १८७२ ह्या दिवशी जन्माला आलेले हे महायोगी अरविंद ! वडिलांनी मुलांना भारतीय संस्कृतीचा गंधही लागु नये म्हणून वयाच्या सातव्या वर्षीच अरविंदांना लंडनला पाठवलं. तिथे एकही भारतीय संस्कार मुलांवर होणार नाही अशी व्यवस्था लावली. हा मुलगा जात्याच विलक्षण बुद्धिमान नि मेधावी असल्याने लहानवयातच त्याने शेक्सपीयर, यीट्स हे तत्त्वज्ञ वाचून काढले नि काही मुखोद्गतही केले. पुढे वडिलांच्या इच्छेसाठी वयाच्या एकविसाव्या वर्षी त्याकाळची आयसीएसची (आजची UPSC-IAS) परीक्षाही ते उत्तीर्णही झाले. पण ब्रिटीशांची परदास्यता स्वीकारायची नाही ह्या विचाराने एक अश्वारोहण परिक्षा ही पात्रता परिक्षा होती ती त्यांनी हेतुपुरस्सर दिली नाही म्हणून त्यांचं नाव अधिकार्याच्या यादीत आलंच नाही. केवढा विलक्षण त्याग हा ! सुभाषचंद्र बोसांनीही हाच त्याग केला नव्हता का??? पण आज कोणता IAS-IPS विद्यार्थी हा त्याग करेल???
भारतात आगमन नि स्वातंत्र्यकार्यास प्रारंभ
पुढे कालांतराने अरविंद हिंदुस्थानात परत आल्यांनंतर बडोद्याच्या श्री सयाजीराव गायकवाडांशी त्यांचा संपर्क आला नि त्यांच्या महाविद्यालयात त्यांनी काही काळ प्रशासक नि प्राध्यापक पदाचे कार्य केले. याच बडोद्याशी महामानव डाॅ आंबेडकरांचा पण संपर्क आला होता. महाराजांची व्याख्याने लिहिण्याचंही काम केलं. आंग्लभाषेवरचं त्यांचं प्रभूत्व इतकं असामान्य होतं की महाराजांनी एकदा लिहूनच दिलं होतं की तुम्ही लिहिलेलं व्याख्यान इतकं अवघड आहे की लोकांनाकदाचित संशय येईल. "It is too fine to be mine." इथेच त्यांनी हिॅदु संस्कृतीचा नि हिंदुस्थानच्या तत्कालीन राजकीय परिस्थितीचा खोलवर अभ्यास केला.



पुढे बंगालमध्ये परत येऊन स्वातंत्र्यप्राप्तीचं कार्य
श्रीअरविंदांचं बंगालमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांनी तिथे सुबोध मलिक ह्यांनी स्थापन केलेल्या नॅशनल काॅलेज मध्ये अध्यापनाचं काम केलं. एकाएकी श्रीरामकृष्ण परमहंसांचं चरित्र त्यांच्या हाती लागलं नि त्यांच्या मनात एक कुतुहल जागं झालं. त्यांनी प्राणायामाचा अभ्यास सुरु केला नि सहा महिन्यात त्याची परिणिती त्यांना दिसुन आली. त्यांच्या अंगावर डास बसेनासे झाले नि त्वचा अतिशय कांतिमान झाली. कालांतराने विवाहबद्ध होऊन पुढे जाऊन त्यांनी क्रांतिकारकांशी संपर्क साधला. हिंदुराष्ट्राच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ते तळमळत होते. त्यांचे लेख वाचून अनेक तरुण क्रांतिकार्यात उडी घेत. त्यामुळे ब्रिटीशांना अशी भीती वाटायला लागली की आयसीएस झालेला हा माणुस जर ह्या बंगाल्यांचं मार्गदर्शन करायला लागला तर आपलं कसं होणार??? म्हणून त्यांच्या अटकेचे प्रयत्न सुरु झाले नि शेवटी अटक झालीच. पुढे ह्याच अटकेतच त्यांची योगसाधना सुरु झाली. नि भगवान श्रीकृष्णाचा नि विवेकानंदांचा साक्षात्कार त्यांना झाला. आणि इथेच त्यांच्या जीवनाला एक विलक्षण अशी दिशा मिळाली. बॅरिस्टर चिंत्तरंजन दासांनी त्यांची बाजु न्यायालयात मांडताना म्हटलं होते की,
"Long after He is dead and gone, He will be looked upon as a Poet of Patriotism, Propthet of Nationalism and a Lover of Humanity."

कारागृहातील श्रीकृष्णसाक्षात्कार नि उत्तरापथ भाषण
अरविंदांना कारागृहात एक योगसाधनेसाठी एक आवाज सतत मार्गदर्शन करत होता. हा आवाज होता विश्वमानव स्वामी विवेकानंदांचा ! भारतीयांची खंडित झालेली यगपरंपरा पुन्हा मंडित करण्याचं कार्य तुला करायचं आहे ह्या स्वामीजींच्या आदेशाने अरविंदांनी ती योगसाधना सुरु केली. आणि पुढे ह्या अलीपुरच्या कारागृहात त्यांनी पूर्ण पुरुषोत्तम योगयोगेश्वर भगवान श्रीकृष्णाचा साक्षात्कार झाला. काय योगायोग आहे पहा ! एक पाश्चिमात्य संस्कारात वाढलेला एक आयसीएस अधिकारी पुन्हा भारतात येतोज्याला भारतीयत्वाचा काही गंधही नसतो त्याला श्रीमत् स्वामी विवेकानंद आणि योगेश्वर श्रीकृष्णाचं मार्दर्शन मिळतं ही नियतीची योजनाच म्हणायची !
उत्तरापथ भाषण (Uttarapara Speech) - ३० मे, १९०९
श्रीअरविंद जेंव्हा सुटुन कारागृहातून निर्दोष सुटून आले तेंव्हा त्यांनी त्यांच्या स्वागतास उत्तर देताना जगप्रसिद्ध असं एक भाषण दिलं की जे उत्तरापथ भाषण (Uttarapara Speech) नावाने गणलं जातं. ३० मे, १९०९ चं ते भाषण जिज्ञासुंनी अवश्य वाचावं. श्रीअरविंदांच्या विलक्षण अशा आत्मविश्वासाचे नि भविष्यवेधाचे ते एक प्रतिबिंब आहे. भारतावरच्या नि आर्य सनातन वैदिक हिंदु धर्मावरच्या त्यांच्या अलौकिक नि असीमित अशा प्रेमाचं, श्रद्धेचं नि त्यागाचं ते एक दर्शन आहे.
योगसाधनेस सुरुवात
"Spirituality is indeed the master key of the India mind, the sense of the infinite is native to it. - Shri Aurobindo"
कारागृहातील श्रीकृष्णाचा नि विवेकानंदांचा साक्षात्कार त्यांना इतका प्रेरणादायी ठरला की गांधीजींच्या "आतल्या आवाजा"प्रमाणे तो पुढे जीवनभर त्यांचं मार्गदर्शन करत राहिला. पुढे त्याच आवाजाच्या उपदेशाने ते फ्रेंचांची वसाहत असलेल्या पुदुच्चेरी (पाँडेचरी) इथे जाउन राहिले. इथेच त्यांच्या योगसाधनेस सुरुवात झाली. आयुष्यातली पुढची चार दशके ते इथेच कायमचे राहिले. इतिहासात अशी घटना क्वचितच घडली असेल की सुरुवातीला पूर्ण आंग्लाळलेला एक उच्चशिक्षित नि विलक्षण प्रतिभासंपन्न असा तरुण पुढे जाऊन एकाच ठिकाणी राहून इतक्या प्रदीर्घकाळ योगसाधना करतो. इथले सर्व अनुभव त्यांनी आपल्या ग्रंथांत शब्दबद्ध केले आहेत. ते मुळातूनच वाचण्यासारखे आहे.

श्रीअरविंदाचे साहित्य नि तत्वज्ञान
श्रीअरविंद हे जसे प्रज्ञावंत होते तसेच ते एक महाकवीही होते. सावित्री नावाची त्यांची कविता ही जगातली सर्वात मोठी कविता आहे. महाकवी कालिदासाची प्रतिभासंपन्नता लाभलेला हा महाकवी इतक्या उत्कटतेने अशा काव्याची निर्मिती करतो काय अन् योगसाधनेच पारंगत होऊन हिंदुस्थानचा इतिहास, वर्तमान नि भविष्य ह्याचा भाष्यकार होतो काय हे खरंच महदाश्चर्य करण्याचे विषय आहेत.
Life Divine हा ग्रंथ नि जीवनविषयक तत्वज्ञान
त्यांचा हा ग्रंथ त्यांचे जीवनविषयक तत्वज्ञान स्पष्ट करणारा ग्रंथ आहे. द्विखंडात्मक असा हा ग्रंथ असुन भाषा अतिशय अवघड नि वाक्ये अतिशय पल्लेदार आहेत. सेनापती बापटांनी त्याचा मराठी अनुवाद केला आहे. मी स्वत: तो मुळ इंग्रजी वाचला असला तरी तो माझ्या डोक्यावरून गेला ही गोष्ट अर्थातच वेगळी सांगायला नको.विवेकानंदापेशा अरविॅदांच इंग्रजी हे अतिशय अवघड आहे.
वेदोपनिषदांवरचे भाष्यकार
श्रीअरविंदांची ग्रंथसंपदा ही विलक्षण चिंतनीय नि मननीय नि पठणीय आहे. Secret of the Vedas नि Hymns to the Mystic Fire ह्या दोन ग्रंथांत त्यांनी वेदांबाबतचा त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट केला आहे. महाभारत रामायणावरचेही त्यांचे भाष्य उपलब्ध आहे.वेदांत गोहत्या नाहीचनाही हे ठासून सांगणारे ते एक भाष्तार आहेत. सायणाचार्यांपासून ते मॅक्सम्युलरपर्यंत सर्वांच्या लेखनाचा त्यांनी अभ्यासपूर्ण मागोवा घेतलेला असून प्रसंगी टीकाही केलेली आहे. इतकंच नव्हे तर वेदांवरच्या भाष्याबाबत त्यांनी स्वामी दयानंदाचंच भाष्य अधिक सटीप, साधार नि तर्कशुद्ध नि वास्तवाला धरून आहे असं सिद केलं आहे. त्यांच्या Bankim, Tilak and Dayanand ह्या ग्रंथात ते म्हणतात
"Interpretation in detail is a work of intelligence and scholarship and in matters of intelligent opinion and scholarship men seem likely to differ to the end of the chapter, but in all the basic principles, in those great and fundamental decisions where the eye of intuition has to aid the workings of the intellect, Dayananda stands justified by the substance of Veda itself, by logic and reason and by our growing knowledge of the past of mankind.
In the matter of Vedic interpretation I am convinced that whatever may be the final complete interpretation, Dayananda will be honoured as the first discoverer of the right clues. Amidst the chaos and obscurity of old ignorance and age-long misun- derstanding his was the eye of direct vision that pierced to the truth and fastened on that which was essential. He has found the keys of the doors that time had closed and rent asunder the seals of the imprisoned fountains."
हिंदुस्थानच्या इतिहासासंदर्भातले त्यांचं चिंतन
हे सर्व The Renaissance in India आणि भारतीय संस्कृतीचा पाया(The Foundation of Indian Culture) ह्यात आलं आहे. त्यांचं राजकीय नि सामजिक चिंतन नि तत्कालीन परिस्थितीवरचे भाष्य हे त्यांनी वंदे मातरम् (Bande Mataram), Early cultural writtings, कर्मयोगिन् (Karmayogin) नि आर्य (Arya) ह्या त्यांच्या मासिकातून वेळोवेळी प्रकट केले आहेत.
श्रीअरविंदांचे सिद्धांत
आर्य हे मुळचे भारतीयच असे सांगणार्यांपैकी एक म्हणजे श्रीअरविंद. वेदांमध्ये गोहत्या नाही हेदेखील ठामपणे सांगणारे तेच. हिंदुस्थानचा इतिहास हा वैभवशाली नि गौरवशाली असुन जगाच्या तुलनेत तो कित्येत दृष्टीने प्रगत होता हे अभ्यासपूर्ण रीतीने ठासविणारे श्रीअरविंदच ! सनातन धर्म हाच आपला राष्ट्रधर्म आहे; जर तो नष्ट झाला तर आपल्या राष्ट्राचाही नाश होईल असा संदेश देणारे श्रीअरविंद !
वेगळेपण त काय ह्या चरित्रात???
आजची तरुणाई भारतात राहूनही परदेशाची स्वप्ने पाहते नि भारत हा कधीही न सुधारणारा देश आहे असा सोयीचा निष्कर्ष काढून दायित्वापालून पलायन करते. पण श्रीअरविंदांचे वेगळेपण हे आहे की वयाच्या ऐन पंचविशीपर्यंत भारतीय संस्कृतीचा गंधही नसणारा एक भारतीय युवक पुढे जाऊन हिंदुधर्माचा कट्टर अनुयायी नि समर्थक होतो, चाळीस वर्ये एकाच जागी राहून तो एक महायोगी होतो, उत्कट असा प्रतिभासंपन्न महाकवी होतो, वेदांवरचा नि इतर धर्मशास्त्रांवरचा भाष्यकार नि भाषाप्रभु होतो, हिॅदुस्थानचा इतिहास, वर्तमान नि भविष्य ह्याचा उत्तम नि तर्कशुद्ध असा विवेचक होतो, समाजसुधारक होतो, जगातल्या सर्वात मोठ्या अशा कवितेचा निर्माता असा महाकवी होतो ! काय सांगायचं आहे का अजुन??? अशा ह्या महायोग्यास विनम्र अभिवादन !!!! 🙏🙏🙏



किती लिहु आणि कसं लिहु??? लिहिलं तेवढं कमी आहे. विस्तारभयास्तव लेखाचा शेवट त्यांच्याच "भवानी भारती" ह्या संस्कृत ग्रंथातल्या शब्दात करतो. भारतमातेबददल ते म्हणतात
न हि सा कश्चित् भूखण्डविशेष:, न वा भाषाया: अलंकार: न वा मनसा कल्पना ! सा खलु महाशक्ति: ! यथा भवानी महिषमर्दिनी बलपुंजरुपेण संहतानाम्, ऐक्यग्रथितानां कोटिश: देवानां शक्तै: आविर्भूता तथैव राष्ट्रस्य अंगभूतानां कोटिश: प्रजानां समवायेन सा निर्मिता: ! यां शक्तिं वयं भारतवर्षं भवानी भारतीं वा मन्यामहे सा हि त्रिशत्कोटिप्रजानां शक्तै: जीवत्समवाय:, किन्तु सा निष्क्रिया, तमस: मोहावर्ते निगडिता, स्वसन्तानानां क्षुद्रस्वार्थरतेन जाड्येन अज्ञानेन च ग्रस्ता ! अन्तस्थ: ब्रह्मण: जागरणम् एव तमस: मुक्ते: उपाय: !
भवानी भारती: - श्रीअरविन्द: !!!!
अरविॅदांबद्दल एकाने म्हटलेलंच आहे
त्वमादिदेवं पुरुष: पुराण: त्वमस्य विश्वस्य परं विधानम् !
वेद्यासि वेद्यं च परं चं धामं त्वया ततं विश्वमनन्तरुपम् !
तुकाराम चिंचणीकर

Tuesday, May 19, 2015

कालच्या पंडित नथुराम गोडसे ह्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!!



महाभारतामध्ये एक श्रेष्ठ नि वंदनीय व्यक्तिमत्व म्हणजे भीष्म पितामह ज्यांचा अर्जुनाने रणक्षेत्रावर वध केला ! तो आवश्यकच होता जरी ते त्याचे लाडके काका आजोबा असले तरी ! जरी ते धर्मपरायण नि आजीवन अखंड ब्रम्हचारी नि श्रीकृष्णभक्त असले तरीही. का ??? कारण ते धर्मासाठी नि सत्याच्या विजयासाठी आवश्यकच होतं. गांधीवध देखील असाच आवश्यकच होता.

गांधी हे राजकारणातील भीष्म होते हे मान्य करावंच लागेल. भले त्यांची राजकीय मते ही काही प्रमाणात राष्ट्रहितास घातक ठरलेली असली तरीही त्यांचं हिंदुस्थानच्या राजकारणातलं स्थान हे भीष्माचार्यांप्रमाणेच होतं. म्हणूनच त्यांचा देखील अंत आवश्यकच होता. पंडितजींनी तो केला नि ने अमर झाले. होय अमरच झाले.

राष्ट्रभक्ती हे जर पाप असेल तर त्याचे प्रायश्चित्त घेण्यास मी तयार आहे आणि ते जर पुण्य असेल तर त्यावर माझा नम्र अधिकार आहे असे ठणकावून सांगणारे नथुराम हे प्रखर राष्ट्रभक्त होते. 

लोक आम्हांला म्हणतात की कशाला ती मढी सारखी उकरून काढता???

अहो, का काढू नयेत??? इतिहास कळायला नको का??? ज्यांना इतिहास माहिती नसतो त्यांचं भविष्य देखील अंधारातच असतं. म्हणूनच हा अट्टाहास ! 

गांधींचा पराभव त्यांच्याच अनुयायींकडून

महापुरुषांचा पराभव काहीवेळी त्यांचे अनुयायीच करतात, असा प्रत्यय येतो. गांधीअंतानंतर हिंदुस्थानात ब्राम्हणांच्या ज्या सरसकट कत्तली झाल्या, त्यावरूनच गांधीवाद तिथेच पराभूत झाला हे गांधीभक्त उदार मनाने मान्य करतील काय??? इतकी अंत:करणाची विशालता तुमच्याकडे आहे काय??? तसंही ब्राम्हणद्वेष ही काही नवीन गोष्ट नव्हती हिॅदुस्थानाला. कारण अलेक्झांडरच्या आक्रमणापासून ब्राम्हणांना संपवायचे घाट घातले जात होते. त्याने तर सहा सहस्त्र ब्राम्हणांची सरसकट कत्तल केली होती. मोंगलांनी नि नंतर ब्रिटीशांनी देखील तेच केलं. ब्रिटीशांचा अधिकारी मॅक्सम्युलर तर स्पष्ट म्हणतो की ख्रिश्चन धर्माचा प्रसार जर हिंदुस्थानात करायचा असेल तर तिथल्या पुरोहिताचा पहिल्यांदा उच्छेद करायला हवा. तसं पत्रही उपलब्ध आहे त्याचं. २५ आॅगस्ट, १८५६ च्या चेव्हलियर बनसेन ह्यांना लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो

India is much riper for Christianity than Rome or Greece was at the time St. Paul..... I should like to live for ten years quietly and learn the language, try to make friends and then see whether I was fit to take part in a work, by means of which the old mischief of Indian priest-craft should be overthrown and the way opened for the entrance of simple Christian teaching.... Whatever finds root in India soon overshadows the whole Asia. 

पुढे तर तो स्पष्ट म्हणतो २६ फेब्रुवारी, १८६७ ला डाॅ मिल्मन ह्यांना लिहिलेल्या पत्रात 

"I have myself the strongest belief in the growth of christianity in India. There is no other country so ripe for christianity as is India"

"मला पक्की खात्री आहे की भारतात ख्रिश्चन पंथांचा प्रसार होणारच. भारताईतका सुपीक देश जगात कुठेही नाही ख्रिस्तासाठी."

मोनियर विल्यम्स नावाचा संस्कृत-आंग्ल किंवा आंग्ल-संस्कृत शब्दकोषाचा निर्माता देखील १८७९ साली हेच म्हणतो की

When the walls of mighty forces of Brahmanism (Hinduism) are encircled, undermined and finally stormed out by the soldier of the Cross, the victory of the Christianity must be single and complete."

"ब्राम्हणी (हिंदु) धर्माच्या इमारतीला जेंव्हा क्राॅसच्या सैनिकांकडून खिंडारे पाडली जातील, तेंव्हाच ख्रिस्ताचा विजय हा पूर्ण होईल."



ह्यापेक्षा आणखी ढळढळीत पुरावे आवश्यक आहेत का??  तरीदेखील आमच्यातले काही दीडशहाणे ह्या मॅक्सम्युलरला विद्वान म्हणतात. 

म्हणूनच आमच्या देशाला गांधींची नि नथुरामजी दोघांची देखील आवश्यकता आहे. 

हो नक्कीच आहे. आम्हाला पंडित नथुरामजींची प्रखर राष्ट्रभक्ती नि जाजव्ल्य असा हिॅदु राष्ट्रवाद हवाय नि गांधींचे स्वावलंबन, जनमानसावरची पकड, त्यांचे राष्ट्रप्रेम, ह्रदयातील अपार करुणा हवीय. गांधींनी ज्या चुका केल्या त्या पुन्हा करण्याचं धाडस इथुन पुढे करून नये ह्यासाठी नथुराम जसे आवश्यक आहेत, तसेच महाभारतातील भीष्माचार्यांप्रमाणे ऋषीतुल्य स्थान असणार्या गांधींची देखील आमच्या राष्ट्राला आवश्यकता आहे. कारण

खरे गांधी तथाकथित गांधीभक्तांनी नि काँग्रेसने पुढे येउ दिलेच नाहीत कधीच

गांधींचे जे काही विचार आज जनमानसात प्रचलित आहेत, त्यातले कितपत ते त्यांचे आहेत हे त्यांचे साहित्य वाचल्यावरच आपल्याला लक्षात येतं. एका गालावर मारल्यावर दुसरा गाल हे वाक्य मी तरी कुठे वाचलं नाही. त्यांना राष्ट्रपिता करून फक्त स्वत:चा स्वार्थ साधला एवढंच फक्त त्यांना करता आलं.

गांधींचे हिॅदुत्व काँग्रेसने कधीच पुढे आणलं नाही. त्यांची गोभक्ती कधीच काँग्रेसने पुढे आणली नाही. त्यांचे धर्मांतरावरचे नि शुध्दीकरणावरचे विचार काँग्रेसवाल्यांनी कधीच पुढे आणले नाहीच. जाणूनबुजुन ! ह्याविषयांवर स्वतंत्रपणे कधीतरी लिहीनच. धर्मांतराच्या बाबतीत गांधींचे विचार काय होते नि ते शुध्दीकरणाच्या बाबतीत किती कमालीचे आग्रही होते हे त्यांचं साहित्य वाचल्यावरच कळतं. आज त्यांचं समग्र साहित्य भारत सरकारने १०० खंडांत प्रकाशित केलंय. ते सर्व आंतरजालावर उपलब्ध आहे. पण तथाकथित गांधी भक्त त्यांचे खरे विचार कधीच पुढे आणु देत नाहीत, ही शोकांतिका आहे. 

काँग्रेसने नि गांधींनी अखंड हिंदुस्थान का नाकारला - शेषराव मोरे ह्यांचा ग्रंथ 

ज्येष्ठ विचारवंत मोरे सरांचा हा संशोधनात्मक ग्रंथ वाचल्यानंतर अनेकांची अशी पक्की धारणा होते की फाळणी ही झाली ते बरेच झाल. जर तसं नसतं झालं तर मुसलमान हे अखंड हिंदुस्थानात बहुसंख्य झाले असते नि आयुष्यभर ती साडेसाती भारताला सतावत राहिली असती. एका दृष्टीने हे वरवर पाहता योग्य वाटते पण ह्या मागची आमची गुलामगिरीची मानसिकता कुणाच्याच लक्षात येत नाही हे ह्या राष्ट्राचे दुर्दैव आहे. 

कोण कुठला हा इस्लाम??? सहाव्या शतकाच्या आधी ज्याचं अस्तित्व देखील नव्हतं. कोण कुठले हे ख्रिश्चन ? दोन सहस्त्र वर्षांपूर्वी त्यांचं अस्तित्व देखील नव्हतं. पण इतक्या काळात त्यांनी जगावर राज्य केलं. ख्रिश्चनांनी पहिल्या सहस्त्रकात सगळा युरोप नि दुसर्या सहस्त्रकात अमेरिका खिशात घातला. आता हेच ख्रिश्चन १५ डिसेंबर, १९९९ रोजी जाहीरपणे आवाहन करतात की 

Planting the cross in Asia in 3rd millenium

येत्या तिसर्या सहस्त्रकात सगळा आशिया ख्रिश्चन करणे. हे ते करण्यांचं धाडस करतात. 

मुसलमानांनी १४०० वर्षात ५६ देश मुस्लिम केले. ख्रिश्चनांनी १५२ देश आणि आजही हे दोघे आपल्या ध्येयाप्रती सजग आहेत. 


आणि आम्ही हिॅदु??? सर्वधर्मसमभावचे भक्त !!! 

ज्या गोष्टीची लाज वाचायला हवीय त्याचा अभिमान बाळगणारे ! दुसर्यांना हिॅदु करायचं तर लांबच राहिलं, आमच्या धर्मांतरित हिॅदुंना परत घ्यायची देखील छाती आमची होत नाही. आमचेच आमच्या नावानी बोंबलतात. लगेचच बोंबाबोब ! च्यायला आमचं जळतंय ह्याचं आम्हाला काहीच नाही. सर्वधर्मसमभाव म्हणे ! मुसलमानांना किंवा ख्रिश्चनांना विचारा त्यांना सर्वधर्मसमभाव मान्य आहे का??? एकाच्या तर तोंडी तशी भाषा येते का??? पण आम्ही मात्र गेली ४० वर्षे सर्वधर्मसमभावाचा नाराच लावलाय. सद्गुणविकृती ह्यापेक्षा काय वेगळी असते. एकदा कुराण नि बायबल वाचा मग कळेल हे कितपत खरंय ते ! हिंदुस्थानातले सर्व मुसलमान नि ख्रिश्चन हे मुळचे हिॅदुच आहेत. त्यांना परत हिॅदुत्वात घेणं हीच गांधींजींची पण मनिषा होती नि नथुरामजींची पण. म्हणूनच आम्हाला ते दोघे प्रिय आहेत. 

सेक्युलरिझम नि सर्वधर्मसमभावाचा काडीमात्र संबंध नाही. दोन्ही शब्द वेगळे आहेत.

खरंतर ह्याविषयांवर स्वतंत्रपणे कधीतरी लिहीनच तरीपण ह्या दोन्ही शब्दांचा काडीमात्र संबंध नाही. केवळ काँग्रेसने पसरविलेली घाण आहे ही. मी स्वत: विधी शाखेचा पदवीधर असल्याने सर्वोच्च न्यायालयाची नक्की भूमिका काय आहे हेदेखील मला मान्य आहे. संविधानकर्ते डाॅ बाबासाहेबांची पण ह्या बाबत काय ठोस भूमिका होती हे पण कधीतरी स्पष्ट करेनच. असो ! तूर्तासतरी एवढंच सांगतो की सेक्युलरिझम आम्हांला मान्य नाही. सर्वधर्मसमभाव तर नाहीच नाही. कारण हिॅदुत्व हेच राष्ट्रीयत्व, राष्ट्रीयत्व हेच हिंदुत्व ! 
शेवट सावरकरांच्याच भाषेत

"याल तर तुमच्या सह, न याल तर तुमच्या वाचून नि विरोध कराल तर तुमच्या विरोधात उच्छेदूनही पण हिंदु आपल्या सामर्थ्यानुसार स्वातंत्र्याकरिता लढतच राहतील नि हिंदुराष्ट्र घडवतील."

(कर्णावती येथील हिंदु महासभेच्या अधिवेशनात दिलेले भाषण)

जय शिवाजी ! जय भवानी ! जयतु हिंदुराष्ट्रम् !!! वन्दे मातरम् !!! 

तुकाराम चिंचणीकर
Tukaramchinchanikar.blogspot.com

Tuesday, April 14, 2015

महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर नि गोसंरक्षण



आज महामानव डाॅ. बाबासाहेबांची जयंती ! विद्वत्ता, व्यासंग, चारित्र्यसंपन्नता हीच ज्यांची गुणवैशिष्ट्ये ते बाबासाहेब ! हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये ज्या स्त्री-पुरुषांनी जीवनभर व्रतस्थ राहून विद्वत्ता नि व्यासंगाची आराधना केली, त्यात बाबासाहेबांचं नाव अग्रगण्याने घ्यावं लागेल. बाबासाहेबांचा व्यासंग हा चौफेर होता. हिंदुस्थानच्या इतिहासासंबंधी त्यांनी प्रकट केलेलं चिंतन अतिशय चिंतनीय आहे. ते स्पष्टपणे म्हणतात

"हिंदुस्थानच्या इतिहासासंबंधी पुष्कळ गैरसमज आहेत. पुष्कळ विद्वान इतिहासकारांनी म्हटलेले आहे की हिॅदुस्थानात राजकारणाचा काही गंधच नव्हता. प्राचीन भारतीयांनी केवळ तत्वज्ञान, धर्म अध्यात्म यांविषयी लिहिण्याकडेच लक्ष दिले होते व ते इतिहासापासून राजकारणापासून साफ अलिप्त होते. असेही म्हणतात की हिॅदी जीवन व समाज एका ठराविक पोलादी चोकटीमध्येच फिरत आहेत व त्या चौकटीचे वर्णन केले इतिहासकाराचे काम संपले ! हिंदुस्थानचा प्राचीन काळचा इतिहास अभ्यासल्यानंतर माझे मत मात्र ह्या विद्वानांहूनही अगदी निराळे आहे. ह्या अभ्यासांत मला आढळून आले आहे की, जगांत कुठल्याही देशांत हिंदुस्थानसारखे प्रचंड गतिमान राजकारण नव्हते आणि हिंदुस्थान हा बहुधा एकच देश असा आहे की जगात दुसरीकडे कोठेही दिसली नाही अशी क्रांती घडून आली होती." - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

 काही महिन्यापूर्वीच महाराष्ट्रात गोहत्या बंदी अधिनियम करण्यात आला. त्यावर अनेकांनी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया नोंदवल्या. त्यामुळे ह्या बाबतीत आपल्या संविधानाचे निर्माते महामानव डाॅ. बाबासाहेब ह्यांचे विचार काय आहेत हे पाहणे आवश्यक आहे. म्हणूनच हा लेखन प्रपंच ! 




गोसंरक्षण???  होय गोसंरक्षण ! 

साम्यवाद्यांनी नि ब्रिटीशांनी हिंदुस्थानच्या इतिहासाचे विकृतीकरण करण्याचे जे निंदनीय प्रयत्न केले, त्याला वाचा फोडण्याचे कार्य ज्या ज्या पुरुषांनी केलं त्यात बाबासाहेबदेखील येतात. गोहत्येचं मुळ भारतात ब्रिटीशांनीच रोविलं ह्याचे ठसठशीत पुरावे आज उपलब्ध आहेत. जिज्ञासुंनी एक गांधीवादी विचारक नि इतिहाससंशोधक प्राध्यापक धर्मपाल ह्यांनी ह्या बाबतीत विलक्षण अभ्यास करून ज्या ग्रंथाची निर्मिती केली आहे, तो "भारतीय गोहत्येचं मुळ ब्रिटीश काळात" ग्रंथ वाचावा. बाबासाहेबांनी पण गोसंरक्षण ह्या विषयांवर असंच संशोधन केलं होतं नि त्यांच्या प्रबंधातही त्यांनी ते प्रकट केलंय. १९४८ साली त्यांनी लिहिलेल्या "The Untouchables: Who Were They and Why They Became Untouchables” (1948), ह्या ग्रंथात ह्या संदर्भात चिंतन प्रकट केलं आहेच. पण तंस जरी असलं तरीही ह्या बाबतीत काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. बुद्धिझम असो की वैदिक संस्कृती असो, ह्या दोन्हींनीही गोहत्येचा निषेधच केलाय. वस्तुत: बाबासाहेब तर स्पष्टच सांगतात की गोहत्येच्या विरोधात बुद्धांनीच ठोस पाउलं उचलली आहेत. ते स्पष्ट म्हणतात
“The Buddhists rejected … animal sacrifice, particularly of the cow. The objection to the sacrifice of the cow had taken a strong hold of the minds of the masses as they were an agricultural population and the cow was a very useful animal.”
घटनेचे मुख्य शिल्पकार असलेल्या बाबासाहेबांनी गोपुजनाचे सांस्कृतिक, आर्थिक, ऐतिहासिक महत्व ओळखलं होतं. त्यांच्या त्याच प्रबंधात ते म्हणतात
“The Hindoo devotion to the Cow has been an enigma to most of the foreigners and above all has been an efficient lore in the hands of those half-baked theological failures who go to India to conduct their missionary propaganda for blackmailing the Hindoo. The origin of cow worship is as much economic as that Roman practice of not offering wine to the Gods from unpruned vines. The cow and for that matter all draft animals, is the soul of the farmers. The cow gives birth to oxen which are absolutely necessary to the cultivation of the farm. If we kill the cow for meat, we jeopardize our agricultural prosperity. With full foresight, the ancient Hindoos tabooed cow-flesh and thus prevented cow killing.” 
भारतीय संविधान नि गोसंरक्षण 
आता आपण ह्याबाबतीत संविधान काय म्हणते ते पाहु. बाबासाहेब हे संविधानाचे लेखक असल्याने त्यांनी संविधानात गोसंरक्षणासंदर्भात ह्यासंदर्भातली तरतुद दूरदृष्टीनेच करून ठेवली होती. ज्यांनी संविधान वाचलं असेल त्यांना हे माहिती असेल की संविधानाने प्रत्येक नागरिकाला काही मुलभूत अधिकार (Fundamental Rights) दिले आहेत. इतकंच नव्हे तर त्याचबरोबर काही दायित्वही पार पाडण्यास सांगितली आहेत ज्यांना आपण मुलभूत दायित्व (Fundamental Duties) असं म्हणतो. उदाहरणार्थ राष्ट्रध्वजाचा मान राखणे वगैरे. आता हे सर्व सांगत असताना ह्या मुलभूत अधिकार नि दायित्वांबरोबरच काही मार्गदर्शक तत्वे (Directive Principles of State Policy) सुद्धा सांगितली आहेत. ह्याच तत्वांमध्ये प्रस्तुत विषयासंदर्भात खालील मार्गदर्शक तत्व समाविष्ट केलं आहे.
The Directive Principle -Article 48 of the Constitution states that
“The State shall endeavor to organise agriculture and animal husbandry on modern and scientific lines and in particular take steps for preserving and improving the breeds and prohibiting the slaughter of cows and other milch and draught cattle. “
 म्हणजे वरील तत्व बाबासाहेबांच्या मनातलेच हेतु स्पष्ट करते. सावरकरांनी देखील ह्याच दृष्टिकोनातून गोसंरक्षण मांडलं आहे. पण त्यांच्या त्या लेखाचा खुप चुकीचा नि सोयीनुसार अर्थ घेउन सावरकरांना गोहत्येचे समर्थक समजण्याची घोडचुक करतात. मागे मी त्यासंदर्भात एक लेख लिहिला होताच ज्यामध्ये मी सावरकर हे कसे गोसंरक्षक आहेत असं दाखवलं होतं. त्यामुळे बाबासाहेब नि गोसंरक्षण हा विषय इथेच स्पष्ट होतो. थोडक्यात काय तर घटनाकार देखील जो विषय ठासून मांडतात तो विषय आम्ही मात्र केवळ धार्मिक दृष्टिकोनातून किंवा अध्यात्मिक दृष्टिकोनातूनच पाहतोय असं दर्शवून आम्ही आमचाच घात करून घेतो आहोत. कारण बाबासाहेब किंवा इतरही घटनेचे समर्थक जेंव्हा हा विषय मार्गदर्शक तत्व म्हणून संविधानात मांडतात तेंव्हा नक्कीच त्यामागची आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय नि इतर अनेक गोष्टी लक्षात घेउनच हे तत्व त्यांनी मांडलं असावं. शंकेला जागा असायचं कारणच नाही.

गोहत्याबंदीला विरोध म्हणजे संविधानाला विरोध   

गोहत्याबंदीला विरोध करणार्यांनी एकदा तरी संविधान वाचावं किंवा मार्गदर्शक तत्वे तरी वाचावीत. केवळ चित्रपटकलाकार किंवा अन्य कुणीतरी म्हणतंय म्हणूनच गोहत्याबंदी विधेयकाला विरोध करणं किती अव्यवहार्य नि घटनाबाह्य आहे.  केवळ धर्मशास्रांमध्येच गाईचं महत्व आहे असं नाहीतर आपल्या घटनेतदेखील तेच सांगितलं आहे. धर्मशास्त्र नि गोसंरक्षण ह्या विषयांवर लवकरच माझी लेखमाला प्रकाशित होईल. तेंव्हा आतातरी विरोधकांनी शहाणं व्हावं नि सरकारच्या निर्णयाचं स्वागत करावं ही विनंती ! 

शेवट बाबासाहेबांच्याच वाक्यात करतो


We are Indians first and foremost. We should always be proud of our Indianhood. So nothing under the sun can stop us from becoming a superpower. -Dr. B R Ambedkar

थोर इतिहासकार, तत्वचिंतक, जलतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक, प्रज्ञासूर्य, घटनाकर्ते महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !!! 



Saturday, April 4, 2015

हनुमान जयंती निमित्त हनुमंतांच्या व्यक्तिमत्वाचं एक चिंतन





अश्वत्थामा बलिर्व्यासौ हनुमानश्च विभीषण: !
कृप: परशुरामश्च सप्तैते चिरजीविन: !!

आज हनुमान जयंती. सप्तचिरंजीवांपैकी एक म्हणजे वीर हनुमंत ! नुकतीच रामनवमी साजरी झाली. खरंतर महाबली नि अतुलपराक्रमी नि आजीवन अखंड ब्रम्हचारी अशा श्रीरामचंद्रभक्त  अंजनेय हनुमंताचं चरित्र आम्हांस ज्ञात आहेच पण तरीही त्या नरश्रेष्ठाचं व्यक्तिमत्व नक्की कसं होतं ह्याविषयी रामायणात फार विलोभनीय नि विलक्षण चिंतनीय असं वर्णन आलं आहे. आजकाल व्यक्तिमत्व विकास(Personality Development) हा एक परवलीचा शब्द झाला आहे. अगदी शाळकरी मुलांमध्येदेखील ह्याची प्रचंड आवड किंवा आंग्लभाषेतल्या शब्दाप्रमाणे "क्रेझ"आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ह्या व्यक्तिमत्व विकासासाठी हजारो रुपयाचे वर्ग लावण्यापेक्षा हनुमंताचं चरित्र वाचलं तरी ही आपल्याला बरंच काही शिकायला मिळेल नि व्यक्तिमत्व कसं असावं ह्याचं उत्तम उदाहरण हनुमंताच्या नि रामचंद्राच्या चिंतनातून नि कार्यातून आपल्याला पहायला मिळेलं. त्यासाठी हा लेखनप्रपंच !

रामायणातले किष्किंधा कांड सांगते की मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामचंद्र हे सीतेच्या हरणानंतर कबंधाच्या सुचनेनुसार सुग्रीवाचा शोध घेत असताना ऋष्यमुख पर्वतावर आले. तेंव्हा वालीच्या भयाने राज्यापासून दूर असेला सुग्रीव हा ह्या दोन नरश्रेष्ठांना पाहून किंचित आश्चर्यचकित नि शंकामग्न होउन थोड्या भयानेच का होईना पण आपल्या हनुमंत नावाच्या मंत्र्यांस ह्या दोन राजकुमारांची पारख करण्यास पाठवतो. तेंव्हा हनुमंत हे एका ब्राम्हणाचं रुप घेउन राम-लक्ष्मणांना भेटावयांस येतात नि त्यांस आत्मपरिचय देउन त्यांचा परिचय वगैरे विचारतात. हनुमंतांचं रामाबरोबरचे ते संभाषण जरी वाचलं तर हनुमंतांच्या बुद्धिमत्तेचं दर्शन तर घडतंच पण त्यापेक्षाही एक दुत म्हणून कसं बोलावं ह्याचा एक आदर्शही प्रकट होतो. हनुमंताचं ते सुमधुर बोलणं ऐकल्यावर श्रीरामचंद्र लक्ष्मणांस हनुमंताचं जे वर्णन करतात ते खालीलप्रमाणे आहे. आणि हेच आजचा आपला चिंतनाचा विषय आहे. श्रीरामचंद्र प्रभु म्हणतात की

नानृग्वेदविनीतस्य नायजुर्वेदधारिणम् ! 
नासामवेदविदुष: शक्यमेवं विभाषितुम् !! २८ !!

अर्थ - ज्याला ऋग्वेदाचं शिक्षण मिळालेलं नाही, ज्यानं यजुर्वेदाचा अभ्यास केला नाही, जो सामवेदाचा विद्वान नाही, तो याप्रकारे सुंदर भाषेत वार्तालाप करु शकणार नाही ! 

नूनं व्याकरणं कृत्स्नमनेन बहुधा श्रुतम् ! 
बहु व्याहरतानेन न किंचिदपशाब्दितम् !! २९ !!

अर्थ - निश्तितपणानं ह्या हनुमंताने सर्व व्याकरणाचा अनेक वेळा बारकाईनं अभ्यास केला आहे. कारण इतका वेळ बोलत असुनही त्याच्या तोंडातून एकही अशुद्ध बोल बाहेर पडला नाही !

न मुखे नेत्रयोश्चापि ललाटे च भ्रूवोस्तथा ! 
अन्येष्वपि च सर्वेषु दोष: संविदित: क्वचित् !! ३० !!

अर्थ - संभाषणाच्या वेळी ह्याचे मुख, डोळे, कपाळ, भूवई तसेच अन्य सर्व अंगामधूनही एखादा दोष प्रकट झालेला आहे असं मला दिसला नाही !

अविस्तरमसंदिग्धमविलम्बितमव्ययम् ! 
उर:स्थं कण्ठगं वाक्यं वर्तते मध्यमस्वरम् !! ३१ !!

अर्थ - यानं थोडक्यात पण अगदी स्पष्टपणं आपलं म्हणणं मांडलेलं आहे. ते समजण्यास नि:संदिग्ध होतं. थांबुन थांबुन किंवा शब्द आणि अक्षरे तोडून कुठलंही वाक्य त्यानं उच्चारलं नाही. कुठलंही वाक्य कर्णकटु वाटलं नाही. त्याची वाणी ह्रदयात मध्यमारुपाने स्थिर झाली आहे आणि कंठातून वैखरी रुपाने प्रकट झाली आहे !

संस्कारक्रमसम्पन्नामद्भुतामविलम्बिताम् !
उच्चारयति कल्याणी वाचं ह्रदयहर्षिणीम् !! ३२ !!

अर्थ - बोलताना याचा आवाज फार बारीकही येत नाही नि फार वरही जात नाही. मध्यम आवाजात त्यानं सर्व काही सांगितलं आहे !

अनया चित्रया वाचा त्रिस्थानव्यंजनस्थया ! 
कस्य नाराध्यते चित्तमुद्यतासेररेरपि !! ३३ !!

अर्थ - ह्रदय कंठ आणि मुर्धा ह्या या तीन स्थानांकडून स्पष्ट रुपानं अभिव्यक्त होणारी ह्याची ही चित्रवतवाणी ऐकुन कुणाचं चित्त प्रसन्न होणार नाही. वध करण्या साठी म्हणून तलवार उचललेल्या शत्रुचं ह्रदय देखील ह्या वाणीनं बदलु शकेल !

एवंविधो यस्य दुतो न भवेत् पार्थिवस्य तु ! 
सिद्ध्यन्ति हि कथं तस्य कार्याणां गतयोsनघ !! ३४ !! 

अर्थ - हे निष्पाप लक्ष्मणा, ज्या राजांपाशी ह्यासारखे दुत नसतील, त्यांची कार्य सिद्धी कशी होउ शकेल बरे??? 

किष्किंधा कांड - वाल्मिकी रामायण - सर्ग तीन -  श्लोक संख्या २८ ते ३४

प्रत्यक्ष श्रीरामचंद्राच्या तोंडुन पहिल्याच भेटीत हनुमंताबद्दलचं हे चिंतन ऐकल्यावर हनुमंताचं व्यक्तिमत्व किती विलक्षण प्रभावशाली असेल ह्याची आपण केवळ कल्पनाच करु शकतो. पहिल्याच भेटीत श्रीरामचंद्र हे बोलतात ! काय आश्चर्य आहे ! 

बुद्धिमतां वरिष्ठं अशा हनुमंतांनी सर्व वेदांचा सुक्ष्म रीतीने अभ्यास केला होता नि त्यांचं आचरण पण तसंच होतं. व्याकरणाचा पण त्यांचा अभ्यास आहे. म्हणजे वानर देखील त्यावेळी वेदांचा अभ्यास करत होते. मग तथाकथित स्त्री-क्षुद्रांना नि तथाकथित बहुजन समाजाला वेद नाकारण्याचा प्रश्न येतोच कुठे??? किती दिवस आम्ही हा खोटी धारणा बाळगणार आहोत की हिंदु धर्मात वेदांचा अभ्यास फक्त विशिष्ट जातींपुरता होता नि आहे म्हणून???

रामचंद्रांचा देखील वेदांचा नि संस्कृत व्याकरणाचा अभ्यास होता नि ते देखील त्यात पारंगत असुन रत्नपारखी होते हे किती विलक्षण आहे. असो ! पुढे श्रीरामचंद्र म्हणतात की हनुमंत हे बोलताना कुठेही तुटकतुटक किंवा असंबद्ध किंवा अशुद्ध बोलत नाहीत. चेहरा किंवा अंगप्रत्यंगावरचे हावभाव किंवा हालचाल देखील किती आदर्श नि आचरणीय आहे.

हनुमंताची वाणी ह्रदयात मध्यमारुपाने नि कंठात वैखरी रुपाने स्थिर आहे कारण योगशास्त्रानुसार वाणीचे जे प्रकार आहेत त्यामध्ये मध्यमा, वैखरी, परा नि पश्यंती असे प्रकार आहेत. त्यातही हनुमंत हे पारंगत आहेत हे सिद्ध होतं. कारण त्यांचा आवाजही फार वर किंवा खाली नसुन मध्यम होता. त्यामुळे श्रीरामचंद्र म्हणतात की ह्याची वाणी ऐकुन एखादा शस्त्रधारी देखील आपलं शस्त्र खाली ठेवेल. इतकी विलक्षण सुंदर नि कर्णमधुर वाणी हनुमंतांची आहे. असा मंत्री ज्याच्या जवळ असेल त्याची कार्यसिद्धी झाल्याशिवाय राहील का??? 

व्यक्तिमत्वाचं ह्यापेक्षा उत्तम उदाहरण शोधायची आवश्यकता आहे का ??? वेदांचा नि संस्कृत व्याकरणाचा अभ्यास जर वानर देखील करत असतील तर आम्हा मनुष्यांना तो आज का एवढा अस्पृश्य झालाय??? किती करंटे आहोत आम्ही भारतीय??? दुर्दैवी ते आणखी कोण??? 

रामायणात इतर ठिकाणचे वर्णन

मुळ वाल्मीकी रामायणात हनुमंताचे जे वर्णन आले आहे ते वाचले की मन अक्षरश: थक्क होते. ते बुद्धिमतां वरिष्ठं तर आहेतच पण त्याहीपेक्षा सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांचा प्रखर इंद्रियसंयम म्हणजे कडकडीत असं आजीवन अखंड ब्रम्हचर्य ! 
ब्रम्हचर्याचं सामर्थ्य हे हनुमंताशिवाय अन्यत्र कुठेच फारसं प्रकट झालेलं नाही. महाभारतातल्या भीष्माचार्यांचं उदाहरण तसं जरी असलं तरीही हनुमंतांचं उदाहरण हे विलक्षण प्रेरणादायी आहे. समर्थ देखील म्हणतात की

मुखी राम त्या काम बाधु शकेना ! 
गुणे इष्ट धारिष्ट्य त्या हे चुकेना ! 
महाभक्त शक्त कामास मारी ! 
जगीं धन्य तो मारुती ब्रम्हचारी !

महर्षी वाल्मिकी स्पष्ट म्हणतात की 

न भुमौ नान्तरिक्षे वा ना नाम्बरे नामरालये ! नाप्सु वा गतिसंगं ते पश्यामि हरीपुंगव: ! 

"मारुतीसारखा कुणी जलचरात नाही, भूमीवर नाही, अंतरिक्षात नाही, अंबरात नाही, स्वर्गा नाही !" 


सुग्रीव सीताशोधाच्यावेळी हनुमंतांना उद्देशुन म्हणतो की

"हे हनुमंता, तुला असुर, गंधर्व, नाग, मनुष्य, राजे लोकांचं ज्ञान आहे. लोकपालांसह चौदा भुवने, एकवीस स्वर्गांचे तुला ज्ञान आहे. सागरांसह पर्वताचं तुला ज्ञान आहे. हे मारुती तुझी अकुंठीत गती, तुझा वेग, तेज व स्फुर्ती हे सर्व सद्गुण तुझ्यात परिपुर्ण आहेत. या भुमंडलात तुझ्या सारखा तेजस्वी दुसरा कुणीही नाही."

हनुमंत हे आजीवन अखंड ब्रम्हचारीच ! 

ब्रम्हचर्याचे दोन प्रकार आहेत. एक नैष्ठिक (उपकुर्वाण) ब्रम्हचर्य नि दुसरे गार्हस्थ्य ब्रम्हचर्य ! विवाह करुन देखील केवळ स्वस्त्रीशी तेदेखील शास्त्रात सांगितल्याप्रमाणे संसार करणे देखील गार्हस्थ्य ब्रम्हचर्याचे उदाहरण आहे आजीवन अखंड ब्रम्हचारी भीष्माचार्यांनी महाभारतात धर्मराज युधिष्ठिराला उपदेश करताना गार्हस्थ्य ब्रम्हचर्याची व्याख्या सांगितली आहे. असो ! याज्ञवल्क्यस्मृतीमध्ये ब्रम्हचर्याची व्याख्या अशी केली आहे की

कर्मणा मनसा वाचा सर्वावस्थासु सर्वदा !
सर्वत्र मैथुनत्यागौ ब्रम्हचर्यं प्रचक्षते ! 

अंत्यबिंदु निषेकस्तु मैथुनम् !

अथर्वेवेद पण स्पष्ट सांगतो की

ब्रम्हचर्येण तपसा देवा मृत्युमुपाघ्नत ! 
इन्द्रौ हि ब्रम्हचर्येण देवेभ्य: स्वराभरत !
(अथर्ववेद)
(ब्रम्हचर्याच्या जोरावरच देवतांनी मृत्युवर विजय मिळवला. इंद्राने देखील ब्रम्हचर्यानेच देवांचं राजपद मिळवलं)

भगवान शंकर देखील म्हणतात

सिद्धे बिन्दौ महादेवि किं न सिद्ध्यति भूतले ! 
यस्य प्रसादान्महिमा ममाप्येतादृशौ भवेत् !
न तपस्तप इत्याहुर्ब्रम्हचर्यं तपोत्तमम् ! 
उर्ध्वरेता भवेद्यस्तु स देवो न तु मानुष: ! 


ब्रम्हचर्यांचा महिमा यापेक्षा आणखी गायची आवश्यकता आहे काय? हनुमंत हे तर ब्रम्हचर्याचे मुर्तिमंत उदाहरण आहे. कारण रामायणात स्पष्ट उल्लेख आहे की हनुमंत हे जन्मत:च कांसोटा घेउन जन्माला आले होते. ज्ञानोबाराय म्हणतात

कर्मे हनुमंत उदरी कांसोटा ! कर्मे शुकदेव गर्भिकष्टा ! 

तर अशा ह्या नरश्रेष्ठांस कोटी कोटी प्रणाम !!!

महाबली, अतुपराक्रमी पवनसुत अंजनेय श्रीरामदुत हनुमान की जय ! सियांवर श्रीरामचंद्र की जय !! हिंदुधर्मकी जय !!! हिॅदुराष्ट्रकी जय !!! 


तुकाराम चिंचणीकर - ८८८८८३८८६३

Tuesday, March 17, 2015

स्वामी विवेकानंद ग्रंथावली संचयन – हिंदू धर्माची अधिकृत सनदच घेतली ! आनंदी आनंद !!!

स्वामी विवेकानंद ग्रंथावली संचयन – हिंदू धर्माची अधिकृत सनदच घेतली ! आनंदी आनंद !

(Complete Works of Swami Vivekananda - The Charter of Hindu Faith by Bhagini Nivedita )



काल पापमोचनी एकादशी ! माझ्या जीवनातला एक आनंदाचा दिवस ! डेक्कनच्या संभाजी पुलांवर मला स्वामीजींचे दहा खंड जे ग्रंथावली नावाने परिचित आहेत ते प्राप्त झाले. गेल्या आठ वर्षाची इच्छा काल पूर्ण झाली. मी खरच परमभाग्यवान ! हो कारण...



स्वामीजींचे माझ्या जीवनातले आगमन 

मला चांगले आठवते. इयत्ता ८वी, २००१ चे वर्ष ! आमच्या पंढरीतल्या कवठेकर प्रशालेत मी प्रवेश घेतला होता आणि त्याच वर्षी शहरात विवेकानंदांवर एक परीक्षा घेण्यात आली होती. “स्वामी विवेकानंद संक्षिप्त चरित्र आणि उपदेश” या रामकृष्ण मठाने प्रकाशित केलेल्या छोटेखानी चरित्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती ज्यासाठी माझ्या वर्गातले आम्ही काहीच जण उपस्थित होतो. माझा एक परममित्र वेदमुर्ती  विवेक कुलकर्णी हादेखील होता. रविवारी ही परीक्षा झाली होती सकाळी १०.०० ते १.०० ह्या वेळेत दीर्घोत्तरी प्रश्नांची. आम्ही थोडे उशिरा पोहोचलो. दुर्दैवाने मी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो नाही पण स्वामीजींचे ते चरित्र मात्र माझ्या हृदयपटलावर नि जीवनावर कायमचे कोरले गेले. खरंतर आयुष्यातले मी वाचलेले ते पहिलेच पुस्तक ! पहिल्याच पानावर ठाकूर श्रीरामकृष्ण परमहंसाच्या निर्विकल्प समाधी अवस्थेचा प्रसंग आणि सप्तर्षी मंडळातला त्यांचा सुक्ष्म देहाचा प्रवास नि त्यातल्या एका सप्तर्षीला जागे करणारे छोटे बालक म्हणजे ठाकूर स्वतः आणि ते सप्तर्षी म्हणजे स्वतः स्वामीजी ! मला आजही रोमांचित करणारा हा प्रसंग आहे.



पुढे काही वर्षानंतर...

स्वामीजींचे साहित्याचा परिचय मात्र पुढे झाला. माझा एक परममित्र चिदानंद सर्वागोड ह्याने मला स्वामीजींची राजयोग, ज्ञानयोग आणि ठाकुरांचे चरित्र आणि उपदेश हे तीन ग्रंथ ९ वी मध्ये असताना वाचायला दिली. श्रीरामकृष्णांच्या त्या चरित्राने तर मी आल्हादितच झालो. हिंदुस्थानची मागच्या दोन सहस्त्र वर्षांची अध्यात्मिक साधना ज्या एका महापुरुषामध्ये घनीभूत होऊन अवतरली होती असे ठाकुरजी हे ूा चरित्रकार रोमा रोलांचे उद्गार मला नंतर खर्या अर्थाने पटले.  खरंतर तेवढ्या नकळत्या वयात ज्ञानयोग समजणे अशक्यच होते म्हणून मी राजयोगच झपाट्याने वाचून काढला. कारण गूढ नि रहस्यमय विषयांची आवड माणसाला कधीकधी अवघड साहित्याचेही वाचन करायला भाग पाडते. विशेषरूपाने मला राजयोगाने भुरळ घातली. भले तो समजण्यास नि आचरण्यास कठीण असला तरी मला तो फार भावला. अजूनही ति मोहिनी कायम आहे. का कुणास ठाऊक !



अभ्यासोनि प्रकटावे, नाहीतरी झाकोनि असावे ! प्रकटोनि नासावे,  हे बरे नव्हे !

समर्थांच्या ह्या उक्तीप्रमाणे स्वामीजींचे पहिले तीन खंड पूर्ण वाचूनच व्याख्यान देण्याचा निश्चय केला. १२ जानेवारी, २०१४ ह्या दिवशी पंढरीत स्वामीजींच्या १५१व्या जयंतीनिमित्त माझे पहिले प्रकट व्याख्यान झाले. त्यासाठी “विवेकानंदांचा विश्वदिग्विजय” हा विषय मी निवडला होता आणि म्हणूनच केवळ ग्रंथावलीवर अवलंबून न राहता मेरी लुईस बर्क या पाश्चिमात्य विदुषीने स्वामीजींच्या जीवनावर प्रकाशित केलेलं संशोधनपर असे साहित्य वाचले. Swami Vivekananda In America – New Discoveries  ह्या नावाने त्यांनी लिहिलेला आंग्लभाषेतला खंड वाचून काढला. आणि मगच व्याख्यान दिले. तो दिवसच वेगळा होता माझ्यासाठी ! असो !

खरंतर स्वामीजींचे साहित्य म्हणजे हिंदू धर्माची अधिकृत सनदच आहे. हे ग्रंथ घेतल्यावर माझ्या मनातले भाव मी फक्त खालील वचनात प्रकट करू शकतो. कैवल्यसम्राट संतश्रेष्ठ ज्ञानोबा माउलींनी स्वप्नात दिलेल्या दृष्टांतामुळे ज्या रामेश्वर शास्त्रींना जगद्गुरू तुकोबारायांची योग्यता समजून आली, अंगाची लाहीलाही होताच तुकोबांच्या हस्तस्पर्शाने ज्यांच्या सर्वांगाचा दाह शांत झाला, त्या रामेश्वर शास्त्रींनी जे चार अभंग तुकोबारायांसाठी म्हंटले त्यातल्या पहिल्याच अभंगात थोडा बदल करून, त्यांची क्षमा मागून मी म्हणतो

माझी मज आली रोकडी प्रचीती !

पाहुनी ग्रंथावली हर्ष पावें !

स्वामी सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हां थोर !

कां जे अवतार नरनारायणाचा !




ग्रंथावली निर्मिती आणि प्रसार 

स्वामीजींच्या प्रमुख शिष्या कर्मयोगिनी नि समर्पिता, ज्यांचे वर्णन स्वतः स्वामीजींनी “द रिअल लायनेस”, महायोगी अरविंदांनी “अग्निशिखा’ आणि रवींद्रनाथांनी “लोकमाता’ असे केले होते, अशा भगिनी निवेदितांनीच हे समग्र साहित्य संकलित करून छापले. प्रथम चार खंडात छापले गेलेले हे साहित्य नंतर आज दहा खंडात विविध भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे. ह्याचे श्रेय आणखी एका व्यक्तीला दिले गेले पाहिजे आणि ती म्हणजे स्वामीजींची विदेशातली व्याख्याने टिपून घेणाऱ्या लेखिका श्रीमती गुडविन बाईसाहेब ह्या होत. खरंतर त्यांचे अनंत उपकार म्हणूनच हे साहित्य आज आपणाला मिळते आहे. कारण त्याकाळी ध्वनिमुद्रण करणारी उपकरणे नसल्याने लघुटंक लेखनाच्या सहाय्याने (short-writting) हे साहित्य ग्रथित केले गेले. खरंतर हे साहित्य म्हणजे समग्र भारताचा आत्माच नि चिरंतन असा शाश्वत झरा आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले ह्यांनी एक आठवण ह्या बाबतीत सांगितली आहे की त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात प्राचार्य सोनोमामा दांडेकरांसारख्या लोकोत्तर विद्वानाने देखील त्यांना निक्षून सांगितले होते की तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायचा असेल तर विवेकानंदांची समग्र ग्रंथावली ही प्रस्तावना म्हणून तरी वाचा ! फक्त प्रस्तावना म्हणून !!!  ह्यापेक्षा आणखी मोठेपण सांगायचे काय राहिले आहे ??? प्रत्येकाने हे अजरामर साहित्य वाचावे ही नम्रतेची विनंती ! सर्वात महत्वाचे म्हणजे पुण्यातल्या रामकृष्ण मठाने ह्यातले बरेच साहित्य ध्वनिमुद्रण स्वरुपात प्रकाशित केलय आणि करताहेत. सर्वांनी ते अवश्य घ्यावे आणि ऐकावे ! गुरुदेव रवींद्रनाथ ठाकुरांनी म्हटल्याप्रमाणे जर भारत जाणून घ्यायचा असेल तर विवेकानंद वाचा ! शेवट भगिनी निवेदितांच्याच शब्दात लेखणीला विराम देतो.



“स्वामी विवेकानंदांच्या वाणींतून आणि लेखणींतून निर्माण झालेल्या साहित्याद्वारा एकीकडे जसा समग्र जगताला अमर ज्ञानज्योतीचा परममंगल लाभ झाला, तशीच दुसरीकडे हिंदू संतानांना स्वतःच्या धर्माची अधिकृत सनद (The Charter of Hindu Faith) प्राप्त झाली. स्वतःच्या धर्मासंबंधी आपण बाळगत असलेल्या आपल्या धारणा बरोबर आहेत किंवा नाही हे पडताळून पाहण्यासाठी हिंदू माणूस आणि स्वतःच्या मुलाबाळांना त्यांच्या पूर्वजांचा धर्म काय होता हे शिकवू इच्छिणारी हिंदू आई ही प्रत्ययोत्पादक आणि विश्वसनीय ज्ञानासाठी यापुढे कित्येक युगे ह्याच ग्रंथांच्या पानांकडे वळतील. भारतातून इंग्रजी भाषेचा लोप झाल्यानंतरही, त्या भाषेतून अवघ्या जगाला प्रदान केले हे पसायदान चिरकाल तसेच अक्षुण्ण राहून प्राच्य आणि पाश्च्यात्त्य देशांमध्ये सारखेच फलद्रूप होत राहील. हिंदू धर्माला जर कशाची आवश्यकता होती तर ती म्हणजे स्वतःच्या ज्ञानाचा साठा एकत्रित आणि सुसंघटित करण्याची. जगाला आवश्यकता होती – जिला सत्याचे भय नाही अशा एका धर्मश्रद्धेची. स्वामी विवेकानंदांच्या संदेशाने ही दोन्ही कार्ये साधली आहेत.”  

श्रीरामकृष्ण-विवेकानंद पदाश्रित - निवेदिता – ४ जुलै, १९०७



तुकाराम चिंचणीकर – ८८८८८३८८६३