Tuesday, August 25, 2015

गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवराय - आक्षेप नि खंडण




तुका म्हणे भय न धरी माणसी ! ऐसीयाचे विषी करिता दंड !
तुका म्हणे सत्य सांगे ! येवोत रागे येतील ते !
गुण अवगुण निवाडा ! म्हैस म्हैस रेडा रेडा !
हा तो निवाड्याचा ठाव ! खर्या खोट्या निवडी भाव ! अंगे उणे त्याचे बसे टाळक्यात ! तुका म्हणे आम्ही काय करणे त्यासी ! धक्का खवंदासी लागतसे !
टाका तार्किकाचा संग ! पांडुरंग नित्य स्मरा हो !
भूंकती ते द्यावी भूंको ! आपण ते शिको नयें !
जगद्गुरु तुकोबाराय

सर्वप्रथमच आम्ही स्पष्ट करु इच्छितो की ह्या लेखाचा उद्देश्य ब्राह्मणांना श्रेष्ठ ठरविण्याचा अजिबात नाही. केवळ इतिहास वस्तुनिष्ठपद्धतीने मांडण्याचा आहे.

चरितम् शिवराजस्य भरतस्यैव भारतम् !

शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे, आमची अस्मिता आहे, आमचा स्वाभिमान आहे, आमचा मंत्र आहे. ह्या नावाखाली अख्खा महाराष्ट्र एक होतो. तो होउ नये म्हणून त्यांच्या नावावर जातीपातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न गेली कित्येक वर्षे सुरु आहे. शिवाजी महाराज हे गोब्राह्मण प्रतिपालक होते किॅवा नाही हा वाद मुद्दाम पुन्हा पुन्हा उकरून काढण्यात येतो नि जातीपातीचं राजकारण केलं जातं.शिवाजी महाराज खरंच गोब्राह्नणप्रतिपालक होते का?? की ही ब्राह्मणांनी स्वत:साठी केलेली खेळी आहे ??? नक्की गौडबंगाल काय आहे हे??? हे शोधण्यासाठीच केलेला हा अट्टाहास !

गोब्राह्मण प्रतिपालक म्हणजे नक्की काय???

महाराज गोब्राह्मणप्रतिपालक होते किॅवा नाही हे पहायच्या आधी गोब्राह्मणप्रतिपालक म्हणजे नक्की काय हे समजुन घेऊ. गो म्हणजे गाय ही हिॅदुधर्मात पवित्र नि पुज्य नि अवध्य मानली गेली आहे. वेदांमध्ये १३९ वेळा गाईसाठी "अघ्न्य" म्हणजे अवध्य असा शब्द आला आहे. म्हणजेच वेदांत गोहत्या कुठेच नाही तरीही काही दीडशहाणे वेदांतल्या काही श्लोकांचा चुकीचा अर्थ काढून वेदांत गोहत्या आहे असं प्रतिपादन करतात. त्यांचा शंकांचं निरसन करण्याचा प्रस्तुत लेखाचा विषय नि उद्देश्यही नाही. त्यामुळे शिवाजीमहाराजांनी गाईंचे संरक्षण नि प्रतिपालक स्वत:ला म्हटलं तर त्यात पाप ते काय??? पोटात गोळा यायचं कारण काय??? डाॅ आंबेडकरांसारखा नास्तिक नि हिॅदु धर्मावर टीका करणारा मनुष्य देखील देखील गोहत्या करु नका असं त्यांच्या Untouchables - who were they ह्या ग्रंथात सांगतात. आंबेडकर म्हणतात
"जर आपण गायींची हत्या केली तर आपण आपल्या कृषीविकासाशी तडजोड केल्यासारे होईल. म्हणूनच की काय आपल्या पूर्वजांनी हेतु:पुरस्सर गोहत्येवर बंदी घातली होती"

आता ब्राह्मणांविषयी !

ब्राह्मण कुणाला म्हणाव ह्याचे शास्त्रात जे संदर्भ दिले आहेत ते खालीलप्रमाणे !

यो ब्रह्म जानाति स ब्राह्मण: !
जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण। !

म्हणजो जो प्रत्यक्ष ईश्वराला जाणतो, त्याचा अनुभव घेतो, त्याचा साक्षात्कार अनुभवतो, किंवा तो जाणण्यासाठी काटेकोर नियमांचं पालन करतो तो ब्राह्मण ! ब्रह्म जाणण्यासाठीच्या आतारसंहितेचे जो काटेकोर पालन करतो, तो ब्राह्मण !

समर्थांनी दासबोधात हेच सोप्या पद्धतींत सांगितलं आहे

करिती ब्रह्मनिरुपण ! जाणती ब्रह्म संपूर्ण !
ते चि जाणावे ब्राह्मण ! ब्रह्मविद् !
दशक ६.४.२४

हे ब्रह्मनिरुपण किॅवा ब्रह्म जाणणे म्हणजेच आत्मज्ञान होय. समर्थ म्हणतात

जयांसि झाले आत्मज्ञान ! ते चि थोर महाजन !
वेदशास्त्रे, पुराणे ! साधु-संत बोलिले !
दशक - ६.४.१९

ब्रह्म म्हणजेच ईश्वरास जाणणे म्हणजेच आत्मज्ञान ! ब्रह्म पर्यंत पोहोचून त्याविषयी म्हणजे विश्वामागच्या किॅवा पलीकडील विश्वातीत रुपाची लोककल्याणार्थ उकल करणारे ते ब्राह्नण.

आता ही स्थिती प्राप्त होण्यासाठी काय गुणसंपदा किॅवा आचारसंहिता आवश्यक आहे ती गोतेत भगवंत खालीलप्रमाणे सांगतात

शमो दमस्तप: शौचं क्षान्तिरार्जमेव च !
ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् !

शम, दम् तप, शुचिता, शांती, सरलता, ज्ञान, आत्मज्ञान आणि वेदांच्या प्रमाणत्वावर निष्ठा ही स्वाभाविक ब्रह्मकर्मे किॅवा ब्राह्मणाचे गुणकर्म होय.

आता अशा समाजास मार्गदर्शक असणार्या आचारसंपन्न व्यक्तीचा आदर्श असणे वाईट काय आहे??? अशा व्यक्तींचं संरक्षण करणे हे राजाचे कर्तव्य नव्हे काय??? आजही आपण आपल्या समाजातल्या विविध स्तरांवरच्या लोकोत्तर पुरुषांची काळजी घेतो मग ते वैज्ञानिक असोत किंवा समाजसुधारक असोत किॅवा तत्वज्ञ किॅवा काहीही मार्गदर्शक आहोत. आपण त्यांची सुरक्षा करतोच. त्यांना आजच्या भाषेत Z Plus सुरक्षा देतो मग ते कोणत्याही जातीचे का असेनात. मग शिवछत्रपतींनी त्याकाळी अशा विद्वान नि ज्ञानी नि चारित्र्यसंपन्न अशा काही ब्राह्मणांचं प्रतिपालन केलॅ असेल तर त्यात बिघडलं कुठं???? ह्याचं पाप ते काय??? किॅवा ह्यात जातीवाद तो काय???? ह्यात ब्राह्मणांची दादागिरी आहे काय???

हो महाराज गोब्राह्मणप्रतिपालकच होते ! हे घ्या पुरावे ! ऐतिहासिक साधनांच्या सहाय्याने केलेला हा चिकित्सक प्रयत्न !

सर्वप्रथम आपण समकालीन पुरावे पाहु. ते खालीलप्रमाणे

श्रीशिवराय गोब्राह्मणप्रतिपालक असल्याचा पुरावा 👇

शिवकालीन पत्रसारसंग्रह - शके १५६९ म्हणजे १६४७-४८ -  पत्र क्रमांक २५१९ त्यात उल्लेख आहे की

"महाराज गोब्राह्मणाचे प्रतिपालक आहेती"



श्रीशंभुराजेंनी स्वत: बाकरेशास्त्रींना दिलेल्या त्यांच्या संस्कृत दानपत्रात शिवरायांना "देवद्विजप्रतिपालक" म्हणजे ब्राह्मण प्रतिपालक म्हटलंय !

ब्राह्मण प्रतिपालक असल्याचा पुरावा

नलावडे नावाच्या नाईकवाड्याने प्रभावळी सुभेदाराच्या ब्राह्नण सबनिसाशी भांडण करून त्याच्यावर तरवारेचा हात टाकिला आणि अखेर आपलेच पोटात सुरी मारून घेऊन जीव दिला.
हे समजल्यावर शिवछ्त्रपतींनी ८ सप्टेंबर, १६७१ च्या पत्रात सुभेदार तुको राम ह्याला पत्र लिहिल आहे
"नलावड्याने मराठा होऊन ब्राह्मणावरी तरवार केली याचा नतीजा तोच पावला."
संदर्भ - मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८ क्रमांक २४ चे पत्र

समकालीन नि विश्वसनीय अशा शिवभारतातले पुरावे

शिवछत्रतींच्या इतिहास साधनांत शिवभारत हे समकालीन साधन असल्याने ते प्रमाण मानले जाते. आणि ह्याबाबतीत सर्व इतिहासकारांचे एकमत आहे. हे शिवचरित्र जरी अफझुल्ल्याच्या वधापर्यंत असले तरीही ते शिवछत्रपतींच्या समोरच लिहिले गेले असल्याने अतिशय चिंतनीय आहे. शिवभारतकार कवींद्र परमानंद हे सुरुवातीलाच म्हणतात की आपण हे काव्य शिवाजी महाराजांच्या आज्ञेने लिहीत आहे आणि त्यांची विश्वासार्हता वारंवार प्रत्ययास आल्याने परमानंदांनी ह्या ग्रंथात शिवजन्माची नि अफझुलखान वधाची अशा फक्त दोनच तारखा दिल्या आहेत ज्या इतर साधनांशी ताडून बघता अचुक जुळते ह्यावरूनच ते त्याला कुणीही आक्षेप त्यावेळी तरी कुणी घेतलेला नाही. ह्यावरूनच परमानंदांना शिवचरित्राची जवळून माहिती होती त्यामुळे ते विश्वसनीय खात्रीनेच आहे. अफझुलखान प्रकरणात आणि आग्राच्याही प्रकरणात परमानंद शिवछत्रपतींबरोबर होते ह्याचा पुरावा आहे. आता गोब्राह्नणप्रतिपालकत्वाचे त्यातले पुरावे सविस्तर पाहु.

देवद्विजगवां गोप्का दुर्दान्तयवनान्तक: !
(पहिला अध्याय १५ वा श्लोक)
जो देव, द्विज म्हणजे ब्राह्नण आणि गवां म्हणजे गाईंचे रक्षण करणारा आणि दुर्दम्य यवनांचा काळ किंवा अंत असा

देवानां ब्राह्नणानां च गवां च महिमाधिकम् ! ३९ वा श्लोक)
देव ब्राह्मण आणि गायीचा महिमा याचं वर्णन आहे

त्याकाळच्या स्खितीचं वर्णन करताना परमानंद म्हणतात
न वेदा अप्यधीयन्ते नाभ्यर्च्यन्ते द्विजातय: !
म्लेंच्छधर्मो प्रवर्धन्ते हन्यते धेनवोsपि !
वेदांचे अध्ययन सुटले आहे नि ब्राह्मणांचा सत्कार बंद झाला आहे, म्लेंच्छधर्म वृद्धी पावत आहे आणि गाईंचीही हत्या घडत आहे.
(५ वा अध्याय ४०-४२)

अफझुलखान वधात परमानंद स्वत: शिवछत्रपतींबरोबर होते. त्या संपूर्ण प्रसंगाचं वर्णन करताना शिवछत्रपतींच्या मुखातले उद्गार सांगताना परमानंद म्हणतात

सुराणां भूसुराणांच सुरभीणां च पालनम् !
देवांचे, ब्राह्मणांचे आणि गाईंचे पालन करण्यासाठीच

शिवभारतात आणखी अनेक ठिकाणी शिवरायांना उद्देशून परमानंदांनी गोब्राह्मणप्रतिपालक असा शब्द उच्चारला आहे. तरीदेखील काहीजणांना परमानंदांच्या ब्राह्मण ज्ञातीचा अडसर वाटत असेल तर आपण आणखी काही पुरावे पाहु.

आता प्रत्यक्ष परमप्रतापी छत्रपती श्रीशंभुराजे महाराजांबद्दल काय म्हणतात ते पाहु

ह्या सगळ्यावर संभाजी महाराजांनी जे संस्कृत दानपत्र लिहिलं आहे त्यातील पुरावे !
बाकरेशास्त्रींना दिलेले संस्कृत दानपत्र - २४ आॅगस्ट, १६८०
"सुरुवातीला शंकराला नमस्कार, सद्गुरुला नमस्कार, ब्रह्मा विष्णु महेशांना नमस्कार, गंगा, सरस्वतीला नमस्कार !"
पद्मासनात जो स्थित आहे, कामकलास्तोत्र जो सहा प्रहर रोज पठण करतो तो शंभुराजा असा मी

शिवरायांचे वर्णन करताना ते म्हणतात

शिवराय हे शंकराचे अवतार, वेद,
शास्त्र, स्मृति, आगम, पुराण ह्यांचे जाणकार, जो सदाशिवस्वरुप आहे, देवब्राह्मणप्रतिपालक, सर्व देवालयांचे सरक्षण करण्यासाठी ज्याने आपला जीव खर्च केला, म्लेंछक्षयदीक्षित म्हणजे म्लेंच्छांना धराशायी ज्यांनी केले, ज्याने ताम्र नि तुर्क यांना जर्जर करून सोडले, कल्की अवताराप्रमाणे, हिॅदुधर्माचा जीर्णोध्दार ज्याने केला, अफझुलखानास बिचवा चालवला नि ज्याचे नृंसिहासमान शरीर रक्ताने माखले असा तो माझा पिता !"
आता स्पष्टपणे वर ते शिवरायांना देवब्राह्मणप्रतिपालक म्हणतात. आणखी काय पुरावा हवाय??? तरीदेखील काहीजणांना अजुनही आक्षेप असेल तर ह्या खालील पुरावे पहा.

शंभुराजेकृत बुधभूषणम् आणि ब्राह्मण

पुन्हा एकदा हे सांगणं आवश्यक आहे की ब्राह्मण हा कर्माने नि आचरणाने ब्राह्नण ठरतो. जन्माने नव्हे. म्हणून तर शंभुराजे स्पष्ट पणे बुधभूषणम मध्ये खालीलप्रमाणे सांगतात

अष्टौ पूर्वाणि चिन्हानि नरस्य विनशिष्यत: !
ब्राह्मणान्प्रथमं द्वेष्टि ब्राह्नणश्चैव विरुद्ध्यते !

खालील ८ पूर्वखुणा माणसाचा नाश करतात
१. ब्राह्मणांचा द्वेष करतो,
२. ब्राह्नणांना विरोध करतो किॅवा त्यांच्या कडून अडविला जातो,

ब्राह्मणस्वानि चादत्ते ब्राह्मणांश्च जिघांसति !
रमन्ते निन्दया चैषां प्रशंसां नभिनन्दति !
३. ब्राह्मणांस दास्यवितो, संपत्ती काढून घेतो,
४. हिॅसा करतो,
५. त्यांची निंदा करण्यात रस घेतो,
६. आणि त्यांची प्रशंसा ऐकल्यास आनंदित होत नाही.

नैतान्स्मरन्ति कृत्येषु याचितश्चाभ्यसूयति !
एतान्दोषान्नर: प्राज्ञो वध्ये बुद्ध्वा विवर्जयेत् !
७. त्यांच्या उपकाराचे स्मरण ठेवत नाही
८. याचना करणार्यांचा तो मत्सर करतो.
बुधभूषणम् - ३ अध्याय १२ ते १४ श्लोक

दैवतेषु च यत्नेषु राजसु ब्राह्मणेषु च !
नियन्तव्य: सदा क्रोधो वृद्धबालातुरेषु च !
दैवदेवतांविषयी, राजांविषयी, ब्राह्मणांविषयी, वृद्धांविषयी, लहान मुलांविषयी, आणि दुर्बलांविषयी राग नेहमी प्रयत्नपूर्वक काबुत ठेवाव.

ब्राह्मणेषु क्षमी स्निग्धेष्वजिह्म: क्षोभनोरिषु: !
स्याद्राजा भृत्यवर्गेषु प्रजासु च यथा पिता !
ब्राह्मणाविषयी क्षमाशील असावे, मित्र इत्यादि स्नेह्यांशी सरळ वागावे, शत्रुंविषयी क्रोधाने वागावे.....

शंभुराजे स्वत:बद्दल म्हणतात

धर्मपरंपरेने चालणार्या दाशरथी रामाप्रमाणे जो आहे, शिवयोग्याप्रमाणे ज्याने कपाळावर भस्म लावले आहे, द्विज आणि देवता ह्यांचा आशिर्वाद,
सदाचारी श्रेष्ठ ब्राह्मणाला जो दान धन नि भूमी दान देतो, तो कोटी कल्पांतापर्यंत शिवलोकांत सन्मान पावतो.
ह्या पेणा आणखी काय पुरावा हवाय???

आता काहीजण अजुनही आक्षेप घेतील की शिवरायांनी स्वत:ला गोब्राह्नण प्रतिपालक का म्हटलं नाही???? त्याला आमचं उत्तर

कुणाचं नाव घेऊ नये ह्याची शास्त्रात जी यादी आहे त्यात स्वत:चे व गुरुचं नाव घेऊ नये.
आत्मनाम गुरोर्नाम नामानि कृपणस्यच !
श्रेय:कामानु गृह्णय्यात ज्येष्ठापत्य कलत्रयो: !

मी मी म्हणु नये थोडक्यात स्वत:चं कौतुक करू नये, गुरुचं नाव घेऊ नये, कंजुस माणसाचं नाव घेऊ नये, ज्येष्ट पुत्राचं आणि बायकोचं नावघेऊ नये असं  शास्त्र सांगतं.

शिवाजी महाराजांनी स्वत:ला कधी छत्रपती म्हणून फारसं मिरवलं नाही. त्यामुळे ते छत्रपतीच नव्हचे असं म्हणणं जसं मुर्खपणाचंच ठरेल तद्वतच स्वत:ला गोब्राह्नण प्रतिपालक असं मिरवणंही तितकंच अप्रस्तुत वाटतं. पण तरीही वर उल्लेखिलेल्या नलावडयाचा पत्रातून हे स्पष्ट होतंच आहे.
ह्याच्या उपरही काहीजणांना शंका असेल तर त्यांच्यापुढे आम्हांस हतबलच वाटेल. त्यामुळे इथेच लेखणीला विराम देतो.

प्रौढप्रतापपुरंदर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधीश्वर, गोब्राह्मणप्रतिपालक, हिंदुपदपादशाह, हिंदवी स्वराज्य संस्थापक, हिॅदुकुलभूषण, अखंडलक्ष्मीअलंकृत महाराजाधिराज श्रीमंतश्रीशिवछत्रपती महाराज की जय !!! हिंदुराष्ट्र की जय !!! आर्य सनातन वैदिक हिंदु धर्म की जय !!! जयतु हिंदुराष्ट्रम् !!!

तुकाराम चिंचणीकर

Saturday, August 15, 2015

महायोगी श्रीअरविंदांच्या जयंतीनिमित्त नि स्वातंत्र्यदिनानिमित्त आपणा सर्वांचे हार्दिक अभीष्टचिंतन !!!


महायोगी श्री अरविॅद ! आज जसा हिंदुस्थानचा स्वातंत्र्यदिन तसाच अरविंदांचा जन्मदिवसही ! त्यांची १४३वी जयंती ! मागच्या वर्षी याचदिवशी आदरणीय पंतप्रधानांनी जेंव्हा प्रात:काली स्वातंत्र्यदिनाचा संदेश दिला तेंव्हा श्रीअरविंदांचा उल्लेख केला होता. श्रीअरविंद हे स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील एक महान तत्वज्ञ, महायोगी, कट्टर क्रांतिकारक, वेदांवरचे भाष्यकार, विद्वान, महाकवी, इतिहासकार, भाषाप्रभु, अखंड हिंदुराष्ट्राचे कट्टर समर्थक आणि आणखीही अनेकविध गुणांनी नटलेले एक व्यक्तिमत्व !
काही महिन्यापूर्वी आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी फ्रांसमधल्या दौर्यात अरविंदांच्या पुतळ्यास प्रणाम केला. काय विलक्षण गोष्ट आहे पहा ! मोदी आहेत म्हणून खरंतर हे होतंय ! नाहीतर आपल्या देशात तसेही बरेच जण कोण हे महायोगी अरविंद म्हणून विचारतील आताही नि उद्या भविष्यातही. फ्रांसमध्ये महायोगी अरविंदांचा पुतळा आहे पण आमच्या भारतामध्ये अरविंद माहितीच नाहीत फारसे लोकांना ! किती दुर्दैव म्हणायचं ! ह्याचं उत्तर स्वत: विवेकानंदांनी पण दिलं होतेच म्हणा
" मुलाला शाळेत घातले जाते. तो प्रथम हे शिकतो की आपले वडील हे मुर्ख आहेत, दुसरें म्हणजे आपले आजोबा वेडे आहेत, तिसरे असें की आपले सर्व प्राचीन आचार्य ढोंगी होते, आणि चवथी गोष्ट म्हणजे आपले सर्व धर्मग्रंथ खोटारडे आहेत ! याचा परिणाम असा की पन्नास वर्षाच्या यां शिक्षणांतून, या तींन प्रांतातून मौलिक विचार करणारी एकही व्यक्ती निर्माण होऊं शकली नाही."
ही आहे त्यावेळची परिस्थिती ! आजही काही परिवर्तन झालंय का??? नाहीच नाही ! शालेय अभ्यासक्रमातून श्रीशिवछत्रपती, श्रीअरविंद, श्रीविवेकानंद, रामायण-महाभारत शिकवलं जातं का?? नाहीच नाही ! उलट ते सगळं खोटं कसं आहे हेच ठरविण्याचे प्रयत्न चालतात. आता आपण श्रीअरविंदांच्या चरित्राकडे वळु.
महायोगी श्रीअरविंद चरित्रचिंतन
एतद्देशप्रसुतस्य सकाशादग्रजन्मन: !
स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्यां सर्व मानवा: !
मनुस्मृती
ज्यांच्या जिव्हाग्रांवर प्रत्यक्ष सरस्वतीच नांदत होती असे महापुरुषांच्या जीवनावरचे भाष्यकार एक प्रबोधनकार असे सरस्वतीपुत्र प्राचार्य शिवाजीराव भोसले ह्यांनी अरविंदांवर लिहिलेल्या चरित्रात्मक ग्रंथामुळे नि व्याख्यानांमुळे खरंतर महाराष्ट्राला अरविंदांचं चरित्र माहिती झालं. अरविंदांचं व्यक्तिमत्व, चरित्र, साहित्य नि एकंदरीतच सर्व काही इतकं विलक्षण आहे की ते एका लेखात सांगणं अशक्य आहे, केवळ अशक्य ! तरीही एक लहानसा लेखनप्रपंच !

बंगालमधल्या कलकत्ता भागातल्या एम.डीची परीक्षा उत्तीर्ण असलेल्या डाॅ. कृष्णधन घोष ह्या वैद्यकीय अधिकार्याच्या पोटी १५ आॅगस्ट, १८७२ ह्या दिवशी जन्माला आलेले हे महायोगी अरविंद ! वडिलांनी मुलांना भारतीय संस्कृतीचा गंधही लागु नये म्हणून वयाच्या सातव्या वर्षीच अरविंदांना लंडनला पाठवलं. तिथे एकही भारतीय संस्कार मुलांवर होणार नाही अशी व्यवस्था लावली. हा मुलगा जात्याच विलक्षण बुद्धिमान नि मेधावी असल्याने लहानवयातच त्याने शेक्सपीयर, यीट्स हे तत्त्वज्ञ वाचून काढले नि काही मुखोद्गतही केले. पुढे वडिलांच्या इच्छेसाठी वयाच्या एकविसाव्या वर्षी त्याकाळची आयसीएसची (आजची UPSC-IAS) परीक्षाही ते उत्तीर्णही झाले. पण ब्रिटीशांची परदास्यता स्वीकारायची नाही ह्या विचाराने एक अश्वारोहण परिक्षा ही पात्रता परिक्षा होती ती त्यांनी हेतुपुरस्सर दिली नाही म्हणून त्यांचं नाव अधिकार्याच्या यादीत आलंच नाही. केवढा विलक्षण त्याग हा ! सुभाषचंद्र बोसांनीही हाच त्याग केला नव्हता का??? पण आज कोणता IAS-IPS विद्यार्थी हा त्याग करेल???
भारतात आगमन नि स्वातंत्र्यकार्यास प्रारंभ
पुढे कालांतराने अरविंद हिंदुस्थानात परत आल्यांनंतर बडोद्याच्या श्री सयाजीराव गायकवाडांशी त्यांचा संपर्क आला नि त्यांच्या महाविद्यालयात त्यांनी काही काळ प्रशासक नि प्राध्यापक पदाचे कार्य केले. याच बडोद्याशी महामानव डाॅ आंबेडकरांचा पण संपर्क आला होता. महाराजांची व्याख्याने लिहिण्याचंही काम केलं. आंग्लभाषेवरचं त्यांचं प्रभूत्व इतकं असामान्य होतं की महाराजांनी एकदा लिहूनच दिलं होतं की तुम्ही लिहिलेलं व्याख्यान इतकं अवघड आहे की लोकांनाकदाचित संशय येईल. "It is too fine to be mine." इथेच त्यांनी हिॅदु संस्कृतीचा नि हिंदुस्थानच्या तत्कालीन राजकीय परिस्थितीचा खोलवर अभ्यास केला.



पुढे बंगालमध्ये परत येऊन स्वातंत्र्यप्राप्तीचं कार्य
श्रीअरविंदांचं बंगालमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांनी तिथे सुबोध मलिक ह्यांनी स्थापन केलेल्या नॅशनल काॅलेज मध्ये अध्यापनाचं काम केलं. एकाएकी श्रीरामकृष्ण परमहंसांचं चरित्र त्यांच्या हाती लागलं नि त्यांच्या मनात एक कुतुहल जागं झालं. त्यांनी प्राणायामाचा अभ्यास सुरु केला नि सहा महिन्यात त्याची परिणिती त्यांना दिसुन आली. त्यांच्या अंगावर डास बसेनासे झाले नि त्वचा अतिशय कांतिमान झाली. कालांतराने विवाहबद्ध होऊन पुढे जाऊन त्यांनी क्रांतिकारकांशी संपर्क साधला. हिंदुराष्ट्राच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ते तळमळत होते. त्यांचे लेख वाचून अनेक तरुण क्रांतिकार्यात उडी घेत. त्यामुळे ब्रिटीशांना अशी भीती वाटायला लागली की आयसीएस झालेला हा माणुस जर ह्या बंगाल्यांचं मार्गदर्शन करायला लागला तर आपलं कसं होणार??? म्हणून त्यांच्या अटकेचे प्रयत्न सुरु झाले नि शेवटी अटक झालीच. पुढे ह्याच अटकेतच त्यांची योगसाधना सुरु झाली. नि भगवान श्रीकृष्णाचा नि विवेकानंदांचा साक्षात्कार त्यांना झाला. आणि इथेच त्यांच्या जीवनाला एक विलक्षण अशी दिशा मिळाली. बॅरिस्टर चिंत्तरंजन दासांनी त्यांची बाजु न्यायालयात मांडताना म्हटलं होते की,
"Long after He is dead and gone, He will be looked upon as a Poet of Patriotism, Propthet of Nationalism and a Lover of Humanity."

कारागृहातील श्रीकृष्णसाक्षात्कार नि उत्तरापथ भाषण
अरविंदांना कारागृहात एक योगसाधनेसाठी एक आवाज सतत मार्गदर्शन करत होता. हा आवाज होता विश्वमानव स्वामी विवेकानंदांचा ! भारतीयांची खंडित झालेली यगपरंपरा पुन्हा मंडित करण्याचं कार्य तुला करायचं आहे ह्या स्वामीजींच्या आदेशाने अरविंदांनी ती योगसाधना सुरु केली. आणि पुढे ह्या अलीपुरच्या कारागृहात त्यांनी पूर्ण पुरुषोत्तम योगयोगेश्वर भगवान श्रीकृष्णाचा साक्षात्कार झाला. काय योगायोग आहे पहा ! एक पाश्चिमात्य संस्कारात वाढलेला एक आयसीएस अधिकारी पुन्हा भारतात येतोज्याला भारतीयत्वाचा काही गंधही नसतो त्याला श्रीमत् स्वामी विवेकानंद आणि योगेश्वर श्रीकृष्णाचं मार्दर्शन मिळतं ही नियतीची योजनाच म्हणायची !
उत्तरापथ भाषण (Uttarapara Speech) - ३० मे, १९०९
श्रीअरविंद जेंव्हा सुटुन कारागृहातून निर्दोष सुटून आले तेंव्हा त्यांनी त्यांच्या स्वागतास उत्तर देताना जगप्रसिद्ध असं एक भाषण दिलं की जे उत्तरापथ भाषण (Uttarapara Speech) नावाने गणलं जातं. ३० मे, १९०९ चं ते भाषण जिज्ञासुंनी अवश्य वाचावं. श्रीअरविंदांच्या विलक्षण अशा आत्मविश्वासाचे नि भविष्यवेधाचे ते एक प्रतिबिंब आहे. भारतावरच्या नि आर्य सनातन वैदिक हिंदु धर्मावरच्या त्यांच्या अलौकिक नि असीमित अशा प्रेमाचं, श्रद्धेचं नि त्यागाचं ते एक दर्शन आहे.
योगसाधनेस सुरुवात
"Spirituality is indeed the master key of the India mind, the sense of the infinite is native to it. - Shri Aurobindo"
कारागृहातील श्रीकृष्णाचा नि विवेकानंदांचा साक्षात्कार त्यांना इतका प्रेरणादायी ठरला की गांधीजींच्या "आतल्या आवाजा"प्रमाणे तो पुढे जीवनभर त्यांचं मार्गदर्शन करत राहिला. पुढे त्याच आवाजाच्या उपदेशाने ते फ्रेंचांची वसाहत असलेल्या पुदुच्चेरी (पाँडेचरी) इथे जाउन राहिले. इथेच त्यांच्या योगसाधनेस सुरुवात झाली. आयुष्यातली पुढची चार दशके ते इथेच कायमचे राहिले. इतिहासात अशी घटना क्वचितच घडली असेल की सुरुवातीला पूर्ण आंग्लाळलेला एक उच्चशिक्षित नि विलक्षण प्रतिभासंपन्न असा तरुण पुढे जाऊन एकाच ठिकाणी राहून इतक्या प्रदीर्घकाळ योगसाधना करतो. इथले सर्व अनुभव त्यांनी आपल्या ग्रंथांत शब्दबद्ध केले आहेत. ते मुळातूनच वाचण्यासारखे आहे.

श्रीअरविंदाचे साहित्य नि तत्वज्ञान
श्रीअरविंद हे जसे प्रज्ञावंत होते तसेच ते एक महाकवीही होते. सावित्री नावाची त्यांची कविता ही जगातली सर्वात मोठी कविता आहे. महाकवी कालिदासाची प्रतिभासंपन्नता लाभलेला हा महाकवी इतक्या उत्कटतेने अशा काव्याची निर्मिती करतो काय अन् योगसाधनेच पारंगत होऊन हिंदुस्थानचा इतिहास, वर्तमान नि भविष्य ह्याचा भाष्यकार होतो काय हे खरंच महदाश्चर्य करण्याचे विषय आहेत.
Life Divine हा ग्रंथ नि जीवनविषयक तत्वज्ञान
त्यांचा हा ग्रंथ त्यांचे जीवनविषयक तत्वज्ञान स्पष्ट करणारा ग्रंथ आहे. द्विखंडात्मक असा हा ग्रंथ असुन भाषा अतिशय अवघड नि वाक्ये अतिशय पल्लेदार आहेत. सेनापती बापटांनी त्याचा मराठी अनुवाद केला आहे. मी स्वत: तो मुळ इंग्रजी वाचला असला तरी तो माझ्या डोक्यावरून गेला ही गोष्ट अर्थातच वेगळी सांगायला नको.विवेकानंदापेशा अरविॅदांच इंग्रजी हे अतिशय अवघड आहे.
वेदोपनिषदांवरचे भाष्यकार
श्रीअरविंदांची ग्रंथसंपदा ही विलक्षण चिंतनीय नि मननीय नि पठणीय आहे. Secret of the Vedas नि Hymns to the Mystic Fire ह्या दोन ग्रंथांत त्यांनी वेदांबाबतचा त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट केला आहे. महाभारत रामायणावरचेही त्यांचे भाष्य उपलब्ध आहे.वेदांत गोहत्या नाहीचनाही हे ठासून सांगणारे ते एक भाष्तार आहेत. सायणाचार्यांपासून ते मॅक्सम्युलरपर्यंत सर्वांच्या लेखनाचा त्यांनी अभ्यासपूर्ण मागोवा घेतलेला असून प्रसंगी टीकाही केलेली आहे. इतकंच नव्हे तर वेदांवरच्या भाष्याबाबत त्यांनी स्वामी दयानंदाचंच भाष्य अधिक सटीप, साधार नि तर्कशुद्ध नि वास्तवाला धरून आहे असं सिद केलं आहे. त्यांच्या Bankim, Tilak and Dayanand ह्या ग्रंथात ते म्हणतात
"Interpretation in detail is a work of intelligence and scholarship and in matters of intelligent opinion and scholarship men seem likely to differ to the end of the chapter, but in all the basic principles, in those great and fundamental decisions where the eye of intuition has to aid the workings of the intellect, Dayananda stands justified by the substance of Veda itself, by logic and reason and by our growing knowledge of the past of mankind.
In the matter of Vedic interpretation I am convinced that whatever may be the final complete interpretation, Dayananda will be honoured as the first discoverer of the right clues. Amidst the chaos and obscurity of old ignorance and age-long misun- derstanding his was the eye of direct vision that pierced to the truth and fastened on that which was essential. He has found the keys of the doors that time had closed and rent asunder the seals of the imprisoned fountains."
हिंदुस्थानच्या इतिहासासंदर्भातले त्यांचं चिंतन
हे सर्व The Renaissance in India आणि भारतीय संस्कृतीचा पाया(The Foundation of Indian Culture) ह्यात आलं आहे. त्यांचं राजकीय नि सामजिक चिंतन नि तत्कालीन परिस्थितीवरचे भाष्य हे त्यांनी वंदे मातरम् (Bande Mataram), Early cultural writtings, कर्मयोगिन् (Karmayogin) नि आर्य (Arya) ह्या त्यांच्या मासिकातून वेळोवेळी प्रकट केले आहेत.
श्रीअरविंदांचे सिद्धांत
आर्य हे मुळचे भारतीयच असे सांगणार्यांपैकी एक म्हणजे श्रीअरविंद. वेदांमध्ये गोहत्या नाही हेदेखील ठामपणे सांगणारे तेच. हिंदुस्थानचा इतिहास हा वैभवशाली नि गौरवशाली असुन जगाच्या तुलनेत तो कित्येत दृष्टीने प्रगत होता हे अभ्यासपूर्ण रीतीने ठासविणारे श्रीअरविंदच ! सनातन धर्म हाच आपला राष्ट्रधर्म आहे; जर तो नष्ट झाला तर आपल्या राष्ट्राचाही नाश होईल असा संदेश देणारे श्रीअरविंद !
वेगळेपण त काय ह्या चरित्रात???
आजची तरुणाई भारतात राहूनही परदेशाची स्वप्ने पाहते नि भारत हा कधीही न सुधारणारा देश आहे असा सोयीचा निष्कर्ष काढून दायित्वापालून पलायन करते. पण श्रीअरविंदांचे वेगळेपण हे आहे की वयाच्या ऐन पंचविशीपर्यंत भारतीय संस्कृतीचा गंधही नसणारा एक भारतीय युवक पुढे जाऊन हिंदुधर्माचा कट्टर अनुयायी नि समर्थक होतो, चाळीस वर्ये एकाच जागी राहून तो एक महायोगी होतो, उत्कट असा प्रतिभासंपन्न महाकवी होतो, वेदांवरचा नि इतर धर्मशास्त्रांवरचा भाष्यकार नि भाषाप्रभु होतो, हिॅदुस्थानचा इतिहास, वर्तमान नि भविष्य ह्याचा उत्तम नि तर्कशुद्ध असा विवेचक होतो, समाजसुधारक होतो, जगातल्या सर्वात मोठ्या अशा कवितेचा निर्माता असा महाकवी होतो ! काय सांगायचं आहे का अजुन??? अशा ह्या महायोग्यास विनम्र अभिवादन !!!! 🙏🙏🙏



किती लिहु आणि कसं लिहु??? लिहिलं तेवढं कमी आहे. विस्तारभयास्तव लेखाचा शेवट त्यांच्याच "भवानी भारती" ह्या संस्कृत ग्रंथातल्या शब्दात करतो. भारतमातेबददल ते म्हणतात
न हि सा कश्चित् भूखण्डविशेष:, न वा भाषाया: अलंकार: न वा मनसा कल्पना ! सा खलु महाशक्ति: ! यथा भवानी महिषमर्दिनी बलपुंजरुपेण संहतानाम्, ऐक्यग्रथितानां कोटिश: देवानां शक्तै: आविर्भूता तथैव राष्ट्रस्य अंगभूतानां कोटिश: प्रजानां समवायेन सा निर्मिता: ! यां शक्तिं वयं भारतवर्षं भवानी भारतीं वा मन्यामहे सा हि त्रिशत्कोटिप्रजानां शक्तै: जीवत्समवाय:, किन्तु सा निष्क्रिया, तमस: मोहावर्ते निगडिता, स्वसन्तानानां क्षुद्रस्वार्थरतेन जाड्येन अज्ञानेन च ग्रस्ता ! अन्तस्थ: ब्रह्मण: जागरणम् एव तमस: मुक्ते: उपाय: !
भवानी भारती: - श्रीअरविन्द: !!!!
अरविॅदांबद्दल एकाने म्हटलेलंच आहे
त्वमादिदेवं पुरुष: पुराण: त्वमस्य विश्वस्य परं विधानम् !
वेद्यासि वेद्यं च परं चं धामं त्वया ततं विश्वमनन्तरुपम् !
तुकाराम चिंचणीकर