Friday, October 3, 2014

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संस्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

धर्माचे पालन, करणे पाखंड खंडण !
हेचि करणे अम्हांसि काम, बीज वाढवावे नाम !!
  . . . . . . . .  . . . . . . जगद्गुरु तुकोबाराय

राष्ट्राय स्वाहा ! इदं न मम् !

आजच्या दिवशीच विजयादशमीच्या मुहूर्ताला १९२५ या वर्षी संघाची स्थापना झाली ! डॉ. केशव बळीराम हेडगेवार या ऋषीतुल्य अशा राष्ट्रासाठी जीवनसर्वस्व अर्पण केलेल्या महामानवाने या आजच्या जगातल्या सर्वात मोठ्या स्वयंसेवी संघटनेची मुहुर्तमेढ रोवली !

वटवृक्षाची बी हे मोहरीहूनही छोटं असतं पण त्याचंच रुपांतर शेवटी विशाल अशा वटवृक्षात झालेलं आपण अनुभवतो. संघाच्या बाबतीत हेच घडून आलं आहे. खरंतर कुठल्याही संस्थेचे यशापयश हे त्या संस्थेची तत्वे, कार्यपद्धती, कार्यकर्ते आणि उद्देश यावरच अवलंबून असतं. संघाचं हे यश याच चत:सुत्रीचं फलित आहे. संघाची संस्थापना ही केवळ स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झाली नसून हिंदुस्थानाला त्याचं गतवैभव प्राप्त करून देण्यासाठीही झाली आहे. जर तसं असतं तर हिंदुह्रदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्याप्रमाणे स्वातंत्र्य प्राप्त होताच "अभिनव भारता" या स्वतःच संस्थापिलेल्या संघटनेची सांगता केली तसाच संघाचाही सांगता समारंभ पारपडला असता ! पण हे नाही झालं कारण ध्येय अजूनही अपूर्ण आहे !!!

होय ! हे हिंदुराष्ट्र आहे - डॉ. हेडगेवार !

हिंदुत्व, हिंदुराष्ट्र हे शब्द जरी एेकले तरी काही जणांना लगेचच विंचु चावल्यासारख्या वेदना होतात. मग ते काँग्रेस आणि त्यांची  पिलावळ असो, पुरोगामी ब्रिगेड असो की अन्य कोणी ! खरंतर स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, महायोगी अरविंद यांसारख्या महापुरुषांनी हिंदुत्व नि हिंदुराष्ट्र या दोन्ही संकल्पनांचा सांगोपांग विचार सतत आपल्या साहित्यातून केलेला असूनही आम्ही कपाळकरंटे मात्र ह्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. कारण विरोधकांनी हेतुपुरस्सर विद्रोही विचार करून आमचा बुद्धिभेद केल्यावर याच्या मुळाशी जाण्याचा फारच थोडेफारच विचार करतात ! असो. आज याविषयी सविस्तर बोलणं माझ्या मनात नसलं तरी भविष्यात मात्र नक्कीच माझी भूमिका मांडेन !


संघावरची अकारण टीका आणि त्याला प्रत्युत्तर !

ज्यांनी आयुष्यात कधी संघाची पायरी चढली नाही असे लोक संघावर टीका करताना दिसतात. यातले बरेचसे बुद्धिवादी आणि उच्चपदस्थ असल्याने आणि त्यांना मानणारा वर्ग बहुसंख्य असल्याने नेमकी इथेच फसगत होते. साहित्यिकांनापासून ते समाजसेवकांपर्यंत आणि राजकारण्यापासून ते बुद्धिवाद्यांपर्यंत ! खरंतर या टीकेत नक्की वास्तव किती असतं हे पहायची कुणाचीच तयारी नसते. एखाद्याला काहीतरी अनुभव येतो आणि त्यालाच प्रमाण मानून आपण सर्व व्यवस्थाच दोषी आहे असा सोयीचा निष्कर्ष काढतो. असो.

संघावरच्या सगळ्या टीकांचं उत्तर देणं मला विस्तारभयास्तव शक्य नाही. मी संघाचा प्रवक्ताही नाही. तरीही एक विचार प्रेमी म्हणूनच हा प्रपंच !

१. संघ जातीवादी आहे म्हणे. फक्त ब्राह्मणांचा आहे म्हणे - कोणी सांगितलं ???? अरे, तुम्हाला कुणी अडविलं आहे काय संघात यायला ?? लाज वाटते का तुम्हाला ??? आज संघात सगळे हिंदु एकगठ्ठा आहेत. मग जातीयवादी कसा???

२. संघ परधर्मद्वेष्टा आहे म्हणे ???

कुणी सांगितलं ??? संघानेच मुस्लिम जागरण मंच स्थापन केला असून त्यांना ही बरोब्बर घेतले आहे. संघाचं एेक्यमंत्र ज्यांनी वाचला असेल त्यांना त्यात मुस्लिम नावे सुद्धा आहेत. मग तो परधर्मद्वेष्टा कसा??? मुस्लिमांच्या एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात संगणक ही संघाचीच संकल्पना आहे आणि संघ त्यात हिरिरीने कार्य करत आहे.

हिंदुत्व म्हणजे परधर्मद्वेष अजिबातच नव्हे !


३. लालपावट्या साम्यवाद्यांचा द्वेष आणि प्रत्युत्तर

जण काही श्रमिक वर्गाच्या सर्वोन्नतीचा आपणच ठेका घेतला आहे अशा आविर्भावात वावरणार्या लालपावट्यांनी तर आपली हयात संघद्वेषातच  घालवली. पण ह्याच संघाने आदरणीय श्री. दत्तोपंत ठेंगडींच्या अध्यक्षतेखालीच भारतीय मजदूर संघ, इंटक यांसारख्या अनेक संस्था स्थापन करून श्रमिकांच्या अनेक चळवळी उभ्या केल्या, हे किती जणांना माहिती आहे???

४. संघाचं सांस्कृतिक कार्य काहीच नाही ????

मग संस्कृत भारती, संस्कार भारती या संघटना कोणी स्थापन केल्या???

५. संघाचं हिंदुत्व बोथट???

दुर्दैवाने काही हिंदुत्ववादी संघटनाच ही टीका करतात तेंव्हा दुःख होते. जर हे खरं असतं तर मग बजरंग दल कुणी संस्थापिली??? विश्व हिंदु परिषद कुणी संस्थापिली???

आपल्या पैकी बर्याच जणांना माहिती नसेल पण विश्व हिंदु परिषद हे नाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलं आहे. संघाचे द्वितीय सरसंघचालक गुरुजी हेच परिषदेच्या पुढाकारात होते. "पुरोगामी" महाराष्ट्राला ह्या गोष्टीचा साक्षात्कार कधी होणार आहे देवच जाणे !!!

६. संघाला हाफ चड्डी म्हणणार्याना खुलं आवाहन !

आपणही अशी संस्था निर्माण करावी आणि मग बोलावं. संघावर किती वेळा बंदी घातली तरीही संघ अजूनही फोफावतच आहे ! कारण तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे!

शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी !!!

संघे शक्ती कलियुगे !

कलियुगात एकट्याने काम होणार नाही. ते एकत्र होऊनच पुर्ण होईल !!!


जय हिंदुराष्ट्र ! जय माँ भारती !!!



No comments:

Post a Comment